शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारही आंदोलनाने गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST

चक्काजाम आंदोलन; वाहनांच्या रांगाच रांगा... केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी आणि कामगारविरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी जिल्हाभरात ठिकठिकाणी शनिवारी ...

चक्काजाम आंदोलन; वाहनांच्या रांगाच रांगा...

केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी आणि कामगारविरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी जिल्हाभरात ठिकठिकाणी शनिवारी दुपारी १२ ते ३ या कालावधीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी मार्ग रोखल्याने दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

अंबाजोगाई रोड येथील आंदोलनात काँग्रेस, महाराष्ट्र विकास आघाडी आणि शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये ॲड. व्यंकटराव बेद्रे, मंचकराव डोणे, ॲड. प्रमोद जाधव, बसवंतअप्पा उबाळे, प्रवीण पाटील धनेगावकर, ॲड. प्रदीपसिंह गंगणे, प्रा. एकनाथ पाटील, सुरेश चव्हाण, गोविंद पाटील रेणापूरकर, रमेश सूर्यवंशी, ॲड. शेषराव हाके, रणधीर सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चाैक येथे शनिवारी दुपारी १२ ते २ या कालावधीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करा...

लातुरातील आंदोलनात शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे ॲड. उदय गवारे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, विश्वंभर भोसले, अशोक गोविंदपूरकर, काँग्रेसचे लातूर तालुकाध्यक्ष सुभाष घोडके, दगडू मिटकरी, ॲड. फारूख शेख, आसिफ बागवान, ॲड. देवीदास बोरूळे, सिकंदर पटेल, सचिन गंगावणे, प्रवीण सूर्यवंशी, पंडित कावळे, जगन्नाथ पाटील, ॲड. सुहास बेद्रे, दत्ता सोमवंशी, शरद देशमुख, प्रमोद जोशी, सुंदर पाटील, तबरेज तांबोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्र सरकारने पारित केलेले कामगार आणि शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करावेत, अशी मागणी विविध पक्ष संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. निलंगा, देवणी आणि रेणापूर येथेही चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

सरकारी बळाचा वापर करून शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीने केला जात आहे, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शनिवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.

लातुरातील औसा महामार्गावरील वासनगाव पाटी येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास आंदोलन झाले. यावेळी या मार्गावर काही तासांसाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलनस्थळी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ चक्काजाम आंदोलन झाले.