शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या १७४० जागांसाठी ४ हजार २४ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. २०२१-२२ या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी ३० मार्च ही अर्जांसाठीची अंतिम तारीख होती. जिल्ह्यात १७४० जागांसाठी ४०२४ अर्ज आले असून, राज्यस्तरावरून निघणाऱ्या सोडतीकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

कोरोनामुळे अनेकांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी अर्ज आले आहेत. यामध्ये अहमदपूर तालुक्यातून १५०, औसा- १३७, चाकूर- ९२, देवणी- ५८, जळकोट- १७, लातूर- १७५९, लातूर युआरसी- १२७६, लातूर युआरसी २ - ८५२, निलंगा- १९७, रेणापूर- ५७, शिरूर अनंतपाळ २४ तर उदगीर तालुक्यातील ४०५ अर्जांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील २३८ शाळांनी शिक्षण विभागाकडे २५ टक्के मोफत प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये लातूर तालुक्यातील सर्वाधिक ५४ शाळांचा समावेश आहे. राज्यस्तरावरील सोडत लवकरच जाहीर होणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संदेश पाठविले जाणार आहेत. त्यानंतर निवड झालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. यंदाही शाळास्तरावर कागदपत्रे पडताळणीसाठी समित्या स्थापन केल्या जाणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.

२३८ शाळांची नोंदणी

शिक्षण विभागाकडे २३८ शाळांनी नोंदणी केली असून, यामध्ये अहमदपूर तालुक्यातील १६, औसा २०, चाकूर १४, देवणी ८, जळकोट ४, लातूर ५४, लातूर युआरसी १ - १५, लातूर युआरसी २- ३७, निलंगा २८, रेणापूर ८, शिरूर अनंतपाळ २ तर उदगीर तालुक्यातील ३२ शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १७४० जागा भरल्या जाणार आहेत.

शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यातून १७४० जागांसाठी ४०२४ अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यस्तरावरून लवकरच सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या शाळेत प्रवेश दिले जातील. या प्रक्रियेसाठी २३८ शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली आहे. प्रवेश प्रक्रियेची तयारी केली जात आहे. - विशाल दशवंत,

प्राथमिक शिक्षणाधिकारी

मोफत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरला आहे. राज्यस्तरावर एकच सोडत निघणार असून, त्यानंतर प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश दिले जाणार आहेत. दरवर्षी प्रतीक्षा यादी उशिरा जाहीर होते. तोपर्यंत इतर शाळेतील प्रवेश बंद होतात. त्यामुळे शिक्षण विभागाने पहिल्या सोडतीनंतर प्रतीक्षा यादी लवकर जाहीर करावी.

- ऋषिकेश महामुनी, पालक

लाॅटरी जाहीर झाल्यानंतर कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पुरेसा अवधी देण्याची गरज आहे. पूर्वी तालुकास्तरावर कागदपत्रांची पडताळणी केली जात होती. आता शाळास्तरावर कागदपत्रे तपासली जात आहेत. त्यामुळे तात्काळ प्रवेश होत आहेत. सर्वांनाच प्रवेश मिळणे अशक्य असल्याने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी द्यावी.

- शंकर भोसले, पालक

आरटीईची प्रवेशप्रक्रिया पूर्ण होण्यासाठी भरपूर कालावधी लागतो. तोपर्यंत इतर खाजगी शाळांत प्रवेश बंद होतात. त्यामुळे पालकांची धावपळ होते. आरटीईची प्रक्रिया वेळापत्रकानुसार पार पाडण्यात यावी. त्यामुळे पालकांची गैरसोय होणार नाही. प्रतीक्षा यादी जाहीर होण्यामधील अंतर कमीत कमी चार ते पाच दिवसांचे पाहिजे.

- प्रमोद शिनगारे, पालक

तालुका शाळा जागा अर्ज

अहमदपूर १६ १०१ १५०

औसा २० ८९ १३७

चाकूर १४ ७३ ९२

देवणी ०८ ३९ ५८

जळकोट ०४ ०५ १७

लातूर ५४ ५१९ १७५९

लातूर-१ १५ १५१ २७६

लातूर-२ ३७ ३४७ ८५२

निलंगा २८ १५८ १९७

रेणापूर ०८ ३२ ५७

शिरूर अ. ०२ १२ २४

उदगीर ३२ २१४ ४०५