शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सीएसआर योजनेंतर्गत सहा खेळाडूंना २४ लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : राज्याच्या क्रीडा धोरणातील उद्योजकांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) या योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील ६ खेळाडूंना आजतागायत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : राज्याच्या क्रीडा धोरणातील उद्योजकांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) या योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील ६ खेळाडूंना आजतागायत २४ लाखांची मदत स्पर्धा खर्च, औषधोपचार खर्च व क्रीडा साहित्य या माध्यमातून मिळाली आहे. राज्यात लातूर हा ही योजना राबविणारा एकमेव जिल्हा ठरला आहे.

केंद्र शासनाने उद्योजकांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निश्चित करण्यासाठी सुधारणा केली. या धोरणांतर्गत नफा कमविणाऱ्या कंपनीने त्यांच्या नफ्याच्या २ टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणणे गरजेचे आहे. यात अनुसूचित ग्रामीण खेळ, राष्ट्रीय स्तरावरील मान्यतापात्र खेळ, पॅराऑलिम्पिक खेळ आणि ऑलिम्पिक खेळाच्या संवर्धनाकरिता प्रशिक्षण देणे ही बाब अंतर्भूत केली होती. त्यानुसार लातूर जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली आहे. यात क्रीडा सुविधा, उदयोन्मुख खेळाडूंना अर्थसाह्य, प्रशिक्षण, खेळाशी निगडीत वैद्यकीय सुविधा यासह शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्याची योजना आहे. यात लातुरात आजतागायत सहा खेळाडूंना लाभ देण्यात आला आहे. यामध्ये क्रिकेटपटू सौरभ जांभळे, विनोद आडे, नेमबाज जागृती चंदनकेरे, बेसबॉलपटू ज्योती पवार, कुस्तीपटू निखिल पवार व लक्ष्मी पवार यांना विविध योजनांतून अर्थसाह्य करण्यात आले आहे. एकंदरित, या योजनेमुळे लातूरच्या खेळाडूंना आधार मिळाला आहे.

खेळाडूंना घेतले दत्तक

या योजनेंतर्गत क्रिकेट, कुस्ती खेळातील खेळाडूंना दत्तक घेण्यात आले आहे. त्यांच्या दैनंदिन सरावासाठी दरमहा मानधनही दिले जाते. यात क्रिकेटपटू सौरभ जांभळे याला दरमहा १० हजार रुपये, विनोद आडे याला दरमहा १८ हजार रुपये, कुस्तीपटू निखिल पवार याला ५ हजार रुपये तर लक्ष्मी पवार हिला प्रतिमहा ७ हजार रुपये देण्यात येतात. यासह सौरभ जांभळे याच्या खांद्याच्या शस्त्रक्रियेसाठी १ लाख ६५ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. नेमबाज जागृती चंदनकेरे हिला रायफलसाठी १ लाख ९० हजार रुपये तर आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय निवड चाचणीसाठी मानधन देण्यात येत आहे. बेसबॉलपटू ज्योती पवार हिला बेसबॉल साहित्यासाठी ६० हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.

लातूरच्या खेळाडूंना झाला फायदा

सीएसआर योजना राबविणारा राज्यातील लातूर हा एकमेव जिल्हा आहे. त्यामुळे या माध्यमातून लातूरच्या खेळाडूंना विविध क्रीडाविषयक बाबींसाठी अर्थसाह्य मिळाले आहे. या योजनेमुळे लातूरच्या अनेक खेळाडूंना फायदा मिळाला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन

या योजनेंतर्गत जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरजवंत खेळाडूंना यापुढेही या माध्यमातून अर्थसाह्य करण्यात येणार आहे. राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या खेळाडूंनी या योजनेचा भावी काळात लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.