शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

बीबीएफ पद्धतीने पेरणी केल्यास बियाणांत २० टक्के बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST

हरंगुळ (बु.) : बीबीएफ पद्धतीने पेरणी केल्यास बियाणांत २० टक्के बचत होते. अतिवृष्टी झाली तर जास्तीचे पाणी सरीतून निचरा ...

हरंगुळ (बु.) : बीबीएफ पद्धतीने पेरणी केल्यास बियाणांत २० टक्के बचत होते. अतिवृष्टी झाली तर जास्तीचे पाणी सरीतून निचरा होते. पावसाचा खंड पडला तर पीक तग धरून राहते. तसेच कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. परिणामी, उत्पादनात वाढ होते. त्यामुळे रुंद वरंबा सरी पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी येथे केले.

लातूर तालुक्यातील हरंगुळ (खु.) येथे कृषी विभागाच्यावतीने कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत बीबीएफ पेरणीचा प्रारंभ करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, महेश क्षीरसागर, सरपंच दादाराव पवार, सचिन बावगे, पल्लवी बायस ठाकूर यांची उपस्थिती होती.

हरंगुळ (खु.) शिवारात पाचशे एकरवर बीबीएफ पेरणी झाल्यास ६ हजार किलो बियाणांत बचत होईल. उत्पादन खर्च कमी करून निव्वळ नफा वाढविण्याच्यादृष्टीने बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे यावेळी दत्तात्रय गावसाने म्हणाले.

कार्यक्रमास ग्रा.पं. सदस्य शिवाजी झुंजे, मनोहर झुंजे, अरुण पाटील, सिद्धेश्वर झुंजे, मनोहर भुजबळ, विनायक झुंजे, अंतराम बिडवे, श्रीमंत झुंजे, गणपती होळकर, विवेक झुंजे, नीळकंठ झुंजे, विठ्ठल भंडे, संगमेश्वर पाटील, अशोक पवार, विनोद पाटील, शिवहार पाटील, वैभव पवार, आमिर शेख, विक्रम पाटील, शरद मसलकर, महादेव बिडवे यांची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन

कृषी विभागाच्यावतीने कृषी सहसंचालक तुकाराम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या यशोगाथा सादर करण्यात आल्या आहेत. यावेळी प्रतिभा खडके, पल्लवी बायस ठाकूर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक सूर्यकांत लोखंडे यांनी केले.