शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई सोडतीत १६०४ विद्यार्थ्यांची झाली निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:18 IST

लातूर : आरटीई प्रवेशासाठी राज्यस्तरावर एकच सोडत जाहीर करण्यात आली होती. मात्र, पालकांना निवडीचे संदेश प्राप्त झाले नव्हते. शिक्षण ...

लातूर : आरटीई प्रवेशासाठी राज्यस्तरावर एकच सोडत जाहीर करण्यात आली होती. मात्र, पालकांना निवडीचे संदेश प्राप्त झाले नव्हते. शिक्षण विभागाच्या वतीने गुरुवारी सायंकाळी लातूर जिल्ह्यातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये १ हजार ६०४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सदरील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्राची पडताळणी करून संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी जिल्ह्यातील २३८ शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली होती. जिल्ह्यात १ हजार ७४० जागा असून, यासाठी ४ हजार २४ अर्ज प्राप्त झाले होते. यंदा राज्यस्तरावर एकच सोडत जाहीर करण्यात आली होती. मात्र, पालकांना संदेश तसेच जिल्हा शिक्षण विभागाकडे यादी पाठविण्यात आली नव्हती. गुरुवारी सायंकाळनंतर यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये १ हजार ६०४ विद्यार्थ्यांची शाळानिहाय निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यातील ९७, औसा ७६, चाकूर ६८, देवणी ३४, जळकोट ५, लातूर ९४५, निलंगा १३५, रेणापूर २७, शिरूर अनंतपाळ १२, तर उदगीर तालुक्यातील २०५ अशा एकूण १ हजार ६०४ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणविस्तार अधिकारी दिलीप हैबतपुरे यांनी सांगितले.

तालुकास्तरावर होणार कागदपत्रांची पडताळणी...

आरटीई सोडतमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर असलेल्या पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. शिक्षण विभागाकडे नोंदणी केलेल्या शाळांना प्रवेशाबाबत योग्य त्या सूचना करण्यात आल्या असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विशाल दशवंत यांनी सांगितले.