शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जळकोटातील २५ हजारांपैकी १२० मजुरांच्या हाताला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:17 IST

जळकोट : तालुक्यात मजुरांची संख्या जवळपास २५ हजार असली तरी सध्या प्रशासनाच्या वतीने केवळ १२ कामे सुरू असून, त्यावर ...

जळकोट : तालुक्यात मजुरांची संख्या जवळपास २५ हजार असली तरी सध्या प्रशासनाच्या वतीने केवळ १२ कामे सुरू असून, त्यावर १२० मजूर आहेत. बहुतांश मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने मजुरांचे शहरांकडे स्थलांतर होत असल्याचे दिसून येत आहे.

जळकोट तालुका हा डोंगरी व माळरानाचा म्हणून ओळखला जातो. तालुक्यात केवळ खरीप हंगाम घेतला जातो. सिंचनाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने शेतकरी शेतीबरोबर पशुपालन व्यवसाय करीत आहेत. तसेच तालुक्यात वाड्यातांड्यांची संख्या अधिक असून, ऊसतोड कामगारांची संख्याही जास्त आहे. दरम्यान, तालुक्यात एकूण मजूर जवळपास २५ हजार असून, त्याची महसूल प्रशासनाकडे नोंद आहे.

दरम्यान, तहसील कार्यालयाकडून कामे कमी करून ती वनविभागाकडे देण्यात आली आहेत. मात्र, तालुक्यात वनविभागाच्या रोपवाटिका व इतर कामे कुठे सुरू आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे. पंचायत समितीकडून घरकूल, शोषखड्ड्यांसह अन्य १२ कामे सुरूर असून, त्यावर केवळ १२० मजूर काम करीत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तालुक्यातील मजूर मुंबई, पुणे, सोलापूर, निजामाबाद अशा मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होत असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील माळहिप्परगा, रावणकोळा, अतनूर, गव्हाण, चिंचोली, शिवाजीनगर तांडा, पोमा तांडा, फकरु तांडा, भवानीनगर तांडा, शेलदरा, वांजरवाडा, केकतशिंदगी, उमरगा रेतू, वडगाव, सोनवळा, मंगरूळ, लाळी खु., लाळी बु. आदी गावांमध्ये मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या तालुक्यात शेतीकामेही नाहीत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे.

गावागावांत कामे उपलब्ध करा...

जळकोट तालुका हा खरिपाचा म्हणून ओळखला जातो. सध्या शेतीतही काही कामे नाहीत. त्यामुळे शासनाने रोहयोअंतर्गत तसेच वनविभाग, तहसील, कृषी कार्यालयामार्फत कामे सुरू करावीत. गाव तिथे मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे. मजुरांच्या मुलांचे शिक्षण मोफत करावे. मजुरांचे स्थलांतर थांबवावे, अशी मागणी हरिभाऊ राठोड, संजय हांडे, सुभाष भोसले, रमेश पारे, नागनाथ शेट्टी, अनिल गायकवाड, संग्राम कदम, माधव होनराव, प्रहार संघटनेचे अध्यक्ष संग्राम गायकवाड यांनी केली आहे.