शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

यळगूडकरांची अशुद्ध पाण्यावर गुजराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST

यळगूड गावात गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून निर्माण झालेली पाणीटंचाई कधी आणि कोण दूर करणार? अशा विवंचनेत ग्रामस्थ आहेत. ...

यळगूड गावात गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून निर्माण झालेली पाणीटंचाई कधी आणि कोण दूर करणार? अशा विवंचनेत ग्रामस्थ आहेत. गावातील पाणीटंचाईमुळे पाच वर्षांत जवळपास दोन हजारांहून अधिक ग्रामस्थांनी स्थलांतर केल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, याबाबतचे सोयरसुतक गावच्या कारभाऱ्यांना अजिबात असल्याचे दिसत नाही. रेंदाळ व रणदिवेवाडी यांचीही तहान यापूर्वी या गावाने उदारमनाने भागविली आहे.

सध्या, मात्र उन्हाळा सुरू होण्याआधीच गावाला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून गावात पाणीटंचाई निर्माण होऊन देखील दुर्दैवाने एकही नेता स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत नाही. केवळ कागदी घोडे नाचविण्यातच कारभारी व्यस्त आहेत. गावाला दहा ते पंधरा दिवसांतून एकदा तोही अत्यल्प प्रमाणात रात्री अपरात्री पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी मिळविण्यासाठी विशेषतः महिला वर्गाला रात्री जागून काढाव्या लागत आहेत.

चौकट: 1)ग्रामपंचायतीकडून होणारा अत्यल्प पाणी पुरवठा विचारात घेत ग्रामस्थांना सार्वजनिक व खासगी बोअर तसेच जवाहर साखर कारखाना पंपहाऊस आदींच्या माध्यमातून पाण्याची गरज भागवावी लागत आहे. तसेच कपडे धुणे व जनावरांसाठी गाव तलावातील दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा वापर करावा लागत आहे.

)ग्रामस्थ सध्या राजकारणाची विचित्र अशी परिस्थिती अनुभवत आहेत. गेल्या पन्नास वर्षांपासून गावाची सत्ता आपल्या हातात ठेवणारा वसंतराव मोहिते व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे गट या ठिकाणी भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तेत कार्यरत आहेत. या तिघांचे मिळून १५ सदस्य असतानाही त्यांच्याकडे गावच्या विकासाचा ठोस असा काही अजेंडाच नाही. त्यामुळे गावच्या राजकारणात कुणाचा पायपोस कुणालाही नसल्याचा विचित्र अनुभव ग्रामस्थ घेत आहेत.

-------::--------

फोटो ओळी-यळगूड(ता.हातकणंगले) गावामध्ये सातत्याने निर्माण होत असलेल्या पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामसेवक शशिकांत कांबळे यांना आज निवेदन दिले.