शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीव -रसुरक्षा साधनांची वानवा : वर्षभरात विभागामध्ये १४ कामगार मृत, तर १८ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 1:10 AM

सतिश पाटील ।शिरोली : एमआयडीसीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या एक वर्षातील विविध अपघातात कोल्हापूर विभागात १४ कामगार मृत झाले; तर १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह फक्त नावालाच साजरा होतो. शिरोली एमआयडीसीमध्ये चार दिवसांपूर्वी झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात एका कामगाराला जीव गमवावा लागला, तर ...

सतिश पाटील ।शिरोली : एमआयडीसीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या एक वर्षातील विविध अपघातात कोल्हापूर विभागात १४ कामगार मृत झाले; तर १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह फक्त नावालाच साजरा होतो. शिरोली एमआयडीसीमध्ये चार दिवसांपूर्वी झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात एका कामगाराला जीव गमवावा लागला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अनुषंगाने औद्योगिक सुरक्षा कार्यालयाशी संपर्क साधला असता गेल्या वर्षभरात कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोल्हापूर विभागात झालेल्या अपघातात निष्पाप १४ कामगारांचा बळी गेला आहे, तर १८ कामगार गंभीर जखमी होऊन जायबंदी झाले आहेत .

पश्चिम महाराष्ट्र हा फौंड्री आणि कोकणच्या काजू उद्योगासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या पश्चिम महाराष्ट्रात सुमारे दहा हजारांहून अधिक कारखाने आहेत; पण औद्योगिक सुरक्षा कार्यालयाकडे फक्त तीन हजार कारखान्यांचीच नोंद आहे. उर्वरित कारखान्यांची नोंदच नाही. कंपनीत कामगार काम करीत असताना त्याला सुरक्षेसाठी डोक्याला हेल्मेट, हॅन्डग्लोज, गमबूट, डोळ्यांना घालण्यासाठी गॉगल, इमारतींवर चढण्यासाठी पाळणा, शिडी, लिफ्ट यांसारख्या सुरक्षेची साधनसामुग्री कंपनीतील प्रशासनाने देणे बंधनकारक आहे. याचा कामगारांनी वापर करणे हे ही बंधनकारक आहे. तसेच प्राथमिक उपचारासाठी कंपनीत डॉक्टर ठेवणे हा ही नियम आहे. पण, बऱ्याच कंपनीत कामगारांना सुरक्षेसाठी काहिच दिले जात नाही. फक्त काही हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या मोठ्या कंपनीतील कामगारांना सुरक्षा किट दिले जाते. अनेक ठिकाणी कामगारांना सुरक्षा किट दिले जाते; पण कामगार ते ही घालण्यास टाळाटाळ करतात.

कंपनी प्रशासनाने कामगारांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा किट दिले पाहिजे. ज्या वेळी एखादा अपघात होईल तेव्हा त्या कामगाराला कोणतीही ईजा होणार नाही याची जबाबदारी कंपनी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. हा शासनाचा नियम आहे; पण हा नियम पूर्णत: पायदळी तुडवला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठा फौड्री उद्योग आणि काजू उद्योग हा कामगारांवर अवलंबून आहे. याच कामगारांनी हा उद्योग जगभरात सातासमुद्रापार पोहोचविला आहे; पण हा उद्योग एवढ्या उंचीवर पोहोचविण्यात कामगारांचा मोठा वाटा आहेच. आज मात्र याच कामगारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. 

चार दिवसांपूर्वी शिरोली एमआयडीसीमध्ये झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटाची पुर्ण चौकशी केली जाणार आहे. तसेच औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी कामगारांच्या सुरक्षेच्यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. कामगारांना सर्व सुरक्षा पुरविली पाहिजे. जे उद्योग कामगारांना सुरक्षा पुरविण्यास कमतरता दाखवत असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- सी. व्ही. लभाणे, सहसंचालक,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग.एमआयडीसीत काम करणारा कामगार आज सुरक्षित नाही. वारंवार अपघात होत आहेत. यात कामगारांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. काही ठराविक कंपन्यांमध्येच कामगारांच्या आरोग्याची सुरक्षेबाबत काळजी घेतली जाते. याबाबत सर्व कामगार युनियन लवकरच लेबर कमिशनर व जिल्हाधिकारी यांना भेटणार आहोत .-क्रॉम्रेड इम्रान इलाई जंगले,कोल्हापूर जनरल कामगार युनियन, लालबावटा जनरल सेक्रेटरी.मालक लोकांनी कामगारांना सुरक्षा ही दिलीच पाहिजे. कंपनीत काम करणारा कामगार हाच कंपनीचा कणा आहे. कामगार सुरक्षित तर कंपनी सुरक्षित त्यामुळे प्रत्येक मालकांने कामगारांना सुरक्षा दिली पाहिजे. एक वर्षापूर्वी स्मॅकच्यावतीने दवाखाना सुरू केला आहे. त्याचाही उद्योजक आणि कामगारांनी लाभ घ्यावा.- राजू पाटील, स्मॅक अध्यक्ष

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMIDCएमआयडीसी