शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

Kolhapur: टोप खाणीतील रॉयल्टीची चौकशी करणार; महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 16:25 IST

उत्खनन करणारा हेलिकॉप्टर घेत असेल शासनाला किती ?

कोल्हापूर : राज्यात ज्या-ज्या ठिकाणी अनधिकृत उत्खनन केले असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, तसेच दगडखाण आणि वाळू खाणचे ड्रोन सर्वेक्षण करणार आहे. हा ड्रोन जीपीएसद्वारे खाणींना जोडला जाणार आहे. आतापर्यंत खाणीत उत्खनन किती झाले, राॅयल्टी किती भरली याची चौकशी लावणार आहे. पुण्यात ड्रोन सर्वेक्षण सुरू केले तसेच कोल्हापूरसह राज्यात सुरू करणार आहे. ज्यांनी राॅयल्टी चुकवली असेल त्यांच्याकडून ती वसूल करू, ज्यांनी भरली नाही त्यांची मालमत्ता जप्त करू, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानपरिषदेत केली.दगड खाणीत उत्खनन करणारा हेलिकॉप्टर घेत असेल तर शासनाला रॉयल्टीपोटी किती कोटी रुपये मिळाले, अशी विचारणा आमदार सतेज पाटील यांनी केली. त्याला महसूलमंत्र्यांनी उत्तर दिले. हातकणंगले तालुक्यातील टोप आणि कासारवाडीच्या हद्दीत डोंगररांगांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत उत्खनन केले जात आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हे उत्खनन नजरेस पडत नाही. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे का, अशी विचारणा करून आमदार पाटील यांनी केली.

हातकणंगले तहसीलदारांच्या अहवालात ४ लाख ब्रास उत्खनन केल्याचा उल्लेख आहे परंतु प्रत्यक्षात दबावाखाली ९६ हजार ब्रासच उत्खनन दाखविले आहे. ज्यांनी दगड खाणीत उत्खनन केले त्यांनी मधल्या काळात हेलिकाॅप्टर घेतले आहे. दगड खाणीत उत्खनन करणारा हेलिकाॅप्टर घेत असेल तर शासनाला किती रॉयल्टी मिळाली पाहिजे, असा सवाल आमदार पाटील यांनी केला.

अनधिकृत उत्खननाचे मोठे रॅकेट आहे. या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी जुनी राॅयल्टी वसुली झाली आहे का याची माहिती घेऊन मगच नवीन उत्खननाला परवानगी दिली पाहिजे. ४ लाख ब्रास उत्खननाच्या नोटिसा काढून २ वर्षे झाली तरी पैसे भरत नसतील आणि दुसऱ्या बाजूला हेच लोक हेलिकाॅप्टर खरेदी करत असतील तर महसूल विभाग नेमका काय करतो, अशी विचारणा त्यांनी केली.

रोज हजारो ब्रास उत्खनन..टोप कासारवाडी हद्दीत अनाधिकृत दगड उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रोज हजारो ब्रास दगड उत्खनन केले जाते, त्यासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केले जाते. शेकडो डंपर दगड उचलतात. शेकडो, जेसीबी आणि पोकलँड उत्खननाचे काम करतात. शासनाचा कर तर भरतच नाहीत. पण उत्खनन मात्र जोरदार सुरू आहे. त्या परिसरातील धुळीचा लोकांना प्रचंड त्रास होतो. खोलवर खाणी तयार झाल्या आहेत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हे उत्खनन दिसत नाही का.. त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे का, असे प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केले.