शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

Kolhapur: टोप खाणीतील रॉयल्टीची चौकशी करणार; महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 16:25 IST

उत्खनन करणारा हेलिकॉप्टर घेत असेल शासनाला किती ?

कोल्हापूर : राज्यात ज्या-ज्या ठिकाणी अनधिकृत उत्खनन केले असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, तसेच दगडखाण आणि वाळू खाणचे ड्रोन सर्वेक्षण करणार आहे. हा ड्रोन जीपीएसद्वारे खाणींना जोडला जाणार आहे. आतापर्यंत खाणीत उत्खनन किती झाले, राॅयल्टी किती भरली याची चौकशी लावणार आहे. पुण्यात ड्रोन सर्वेक्षण सुरू केले तसेच कोल्हापूरसह राज्यात सुरू करणार आहे. ज्यांनी राॅयल्टी चुकवली असेल त्यांच्याकडून ती वसूल करू, ज्यांनी भरली नाही त्यांची मालमत्ता जप्त करू, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानपरिषदेत केली.दगड खाणीत उत्खनन करणारा हेलिकॉप्टर घेत असेल तर शासनाला रॉयल्टीपोटी किती कोटी रुपये मिळाले, अशी विचारणा आमदार सतेज पाटील यांनी केली. त्याला महसूलमंत्र्यांनी उत्तर दिले. हातकणंगले तालुक्यातील टोप आणि कासारवाडीच्या हद्दीत डोंगररांगांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत उत्खनन केले जात आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हे उत्खनन नजरेस पडत नाही. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे का, अशी विचारणा करून आमदार पाटील यांनी केली.

हातकणंगले तहसीलदारांच्या अहवालात ४ लाख ब्रास उत्खनन केल्याचा उल्लेख आहे परंतु प्रत्यक्षात दबावाखाली ९६ हजार ब्रासच उत्खनन दाखविले आहे. ज्यांनी दगड खाणीत उत्खनन केले त्यांनी मधल्या काळात हेलिकाॅप्टर घेतले आहे. दगड खाणीत उत्खनन करणारा हेलिकाॅप्टर घेत असेल तर शासनाला किती रॉयल्टी मिळाली पाहिजे, असा सवाल आमदार पाटील यांनी केला.

अनधिकृत उत्खननाचे मोठे रॅकेट आहे. या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी जुनी राॅयल्टी वसुली झाली आहे का याची माहिती घेऊन मगच नवीन उत्खननाला परवानगी दिली पाहिजे. ४ लाख ब्रास उत्खननाच्या नोटिसा काढून २ वर्षे झाली तरी पैसे भरत नसतील आणि दुसऱ्या बाजूला हेच लोक हेलिकाॅप्टर खरेदी करत असतील तर महसूल विभाग नेमका काय करतो, अशी विचारणा त्यांनी केली.

रोज हजारो ब्रास उत्खनन..टोप कासारवाडी हद्दीत अनाधिकृत दगड उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रोज हजारो ब्रास दगड उत्खनन केले जाते, त्यासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केले जाते. शेकडो डंपर दगड उचलतात. शेकडो, जेसीबी आणि पोकलँड उत्खननाचे काम करतात. शासनाचा कर तर भरतच नाहीत. पण उत्खनन मात्र जोरदार सुरू आहे. त्या परिसरातील धुळीचा लोकांना प्रचंड त्रास होतो. खोलवर खाणी तयार झाल्या आहेत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हे उत्खनन दिसत नाही का.. त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे का, असे प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केले.