शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगेसह सात नद्यांची पूररेषा निश्चित करणार; जलसंपदा विभागाचे आदेश : साडेचार कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील पंचगंगेसह भोगावती, तुळशी, धामणी, कुंभी, जांभळी व कासारी या सात नद्यांची पूररेषा निश्चित करण्याचा निर्णय जलसंपदा ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील पंचगंगेसह भोगावती, तुळशी, धामणी, कुंभी, जांभळी व कासारी या सात नद्यांची पूररेषा निश्चित करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. त्यासाठी ४ कोटी ६८ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली. पूररेषा निश्चित होईल परंतु त्यानुसार लागू केलेले निर्बंधांची कडक अंमलबजावणी होण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त झाली.

राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे बेंचमध्ये नद्यांच्या प्रदूषणाबाबत याचिके(२५-२०१४)मध्ये लवादाने अशा प्रकारची पूररेषा निश्चित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने ७ फेब्रुवारी २०२० ला या नद्यांची पूररेषा निश्चित करण्याबाबतचे पत्र दिले होते. या नद्यांच्या जलशास्त्रीय अभ्यास करून निषेधक (निळी) व नियंत्रक (लाल) पूररेषा निश्चिती व आखणी करण्यात येणार आहे. या कामासाठी ४ कोटी ६८ लाख ८७ हजार रक्कमेच्या अंदाजपत्रकास जलसंपदा विभागाने १ एप्रिल २०२१ ला मान्यता दिली आहे.

या सातही नद्यांची एकूण लांबी ३३८ किलोमीटर आहे. त्यातील एकट्या पंचगंगा नदीची श्री क्षेत्र प्रयागापासून नृसिंहवाडीपर्यंतची लांबी ७६ किलोमीटर आहे. यापूर्वी कोल्हापूर महापालिकेने शिवाजी पुलापासून शिरोली पुलापर्यंतची पंचगंगा नदीची पूररेषा निश्चित केली आहे. आता ती वगळून प्रयागापासून शिवाजी पूल व शिरोली पुलापासून ते नृसिंहवाडीपर्यंत नदीची पूररेषा निश्चित केली जाणार आहे. पूररेषा निश्चित केल्याने नदीच्या पात्रापासून किती अंतरापर्यंत बांधकामे करता येतील याची सीमारेषा निश्चित होते. त्याशिवाय भराव टाकून पात्र संकुचित करण्यावरही निर्बंध येतात. आता कोल्हापूर शहरवगळता पंचगंगेसह अन्य कोणत्याच नदीपासून किती अंतरापर्यंत बांधकामे करता येतील यासंबंधीचे फारसे निकष, नियम नाहीत. त्यामुळे एकदा ही नियमावली निश्चित झाल्यास सरसकट कुठेही बांधकामे करण्यावर किमान काही निर्बंध येतील. फक्त निश्चित केलेल्या पूररेषेशी सरकारी यंत्रणा किती प्रामाणिक राहते हेच महत्त्वाचे आहे.

राज्य शासनाने घेतलेला निर्णय नद्यांच्या सुरक्षतेसाठी व नदी व नदीचे पर्यावरण संरक्षणासाठी स्वागतार्ह आहे; परंतु एकदा पूररेषा निश्चित केल्यानंतर त्यासाठी निश्चित केलेल्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा नुसती कागदावर रेषा निश्चित करून फारसे काही पदरात पडणार नाही.

उदय गायकवाड

पंचगंगा प्रदूषण नियंत्रणासाठी उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीचे सदस्य