शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

प्रामाणिक शेतकऱ्यांचे अनुदान, वीज बिल माफी कोठे गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:03 IST

कसबा सांगाव : प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान, वीज बिल माफीच्या सरकारने ...

कसबा सांगाव : प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान, वीज बिल माफीच्या सरकारने घोषणा केल्या. मोठमोठे फलक लावले, पेढे वाटले. वर्ष होत आले, शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या पदरात अजून काहीच पडलेली नाही. कुठे गेल्या त्या घोषणा, पेढे व फलक? असा संतप्त सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी उपस्थित केला.

कसबा सांगाव, ता. कागल येथे मगदूम मळा येथे झालेल्या शिवार संवाद कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

यावेळी सजवलेल्या बैलगाडीतून घाटगे यांना स्थळापर्यंत आणले व शेतकऱ्यांनी भाजीपाला भेट देऊन त्यांचे स्वागत केले. ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी कोणतीही तरतूद नव्हती. त्यासाठी मोर्चा काढला. राज्यपालांना निवेदने दिली. यानंतर शासनाने 50 हजार रुपये अनुदान जाहीर केले. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याची घोषणा करूनसुद्धा ती परत भरण्यास सांगितले जात आहेत. या घोषणाची आठवण करून देण्याची गरज आहे. सरकारने याबाबतीत लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, बाबगोंडा पाटील, भीमगोंडा टेळे, भीमराव मगदूम, लखन हेगडे आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत बाबासाहेब मगदूम यांनी केले, तर आभार शाहू साखर कारखान्याचे संचालक बाॅबी माने यांनी मानले.

छायाचित्र- .

1) कसबा सांगाव येथील शिवार संवाद कार्यक्रमात समरजित घाटगे यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते भाजीपाला टोपरी देऊन करण्यात आला. 2) कसबा सांगाव येथे आयोजित शिवार संवाद कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी मार्गदर्शन केले.