शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
2
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
5
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
6
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
7
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
8
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
9
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
10
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
11
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
12
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
13
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
14
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
15
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
16
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
17
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
18
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
19
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरची रेल्वे रुळावर कधी येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेल्या १५ पैकी दोनच रेल्वे गाड्या सुरू आहेत. त्यामुळे नियमित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेल्या १५ पैकी दोनच रेल्वे गाड्या सुरू आहेत. त्यामुळे नियमित पुणे, मुंबई, मिरज असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. याशिवाय दुहेरीकरण, प्लॅटफार्म बांधणी, जादा रेल्वेगाड्या, आदी प्रश्न रखडले आहेत. त्यामुळे केंद्रात या प्रश्नी खासदारांनी आवाज उठवावा, अशी मागणी रेल्वे प्रवाशांतून होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च २०२० रोजी बंद झालेल्या १५ रेल्वे गाड्यांपैकी केवळ महाराष्ट्र एक्सप्रेस व कोयना एक्सप्रेस या दोनच रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. विशेषत: कामानिमित्त मुंबई, पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांपैकी ७५ टक्के प्रवाशांचा कल रेल्वेने प्रवास करण्याकडे आहे. मात्र, अत्यल्प गाड्यांमुळे त्यांना खासगी बसेस, एस.टी.चा आसरा घ्यावा लागत आहे. मिरज-पुणे मार्गावर दुहेरीकरणाचे काम रखडल्यामुळे होऊ घातलेल्या कोल्हापूर-पुणे पॅसेंजरची वाट आणखी खडतर झाली आहे. शाहू छत्रपती टर्मिनस अर्थात कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा विकासही रखडला आहे. रेल्वेगाड्या सुरू नसल्यामुळे कोल्हापूर विभागाचा महसूलही घटला आहे. येत्या काळात रेल्वेचे पुणे महाव्यवस्थापक संजीव मित्तल हे कोल्हापूर स्थानकास भेट देणार आहेत. त्यांनी तरी लक्ष देऊन या समस्या सोडवाव्यात. नाही तर खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडून कोल्हापूरकरांना कायमचे समस्यामुक्त करावे, अशी मागणी संतप्त रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.

या समस्यांकडे दुर्लक्ष

- कोल्हापूर-मुंबई (सह्याद्री), कोल्हापूर-सोलापूर, कोल्हापूर-हैदराबाद, कोल्हापूर-बिदर या चार गाड्या सुरू व्हाव्यात.

- सर्वाधिक नोकरदार, विद्यार्थी प्रवासी वर्गाची मागणी - मिरज, कोल्हापूर-सातारा पॅसेजर सुरू करा.

- रखडलेले मिरज-पुणे लोहमार्ग दुहेरीकरण त्वरित पूर्ण करा.

- कोयनासह सर्वच रेल्वेगाड्यांचा गांधीनगर थांबा पूर्ववत सुरू करा.

- कोल्हापूर रेल्वेस्थानकातील प्लॅटफार्म क्रमांक ४, ५, ६ चे रखडलेले बांधकाम पूर्ण करा.

- सुट्टीच्या जादा गाड्यांचे नियोजन करा.

- मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कोल्हापूरकरांना दुय्यम दर्जाची वागणूक थांबावावी.

कोट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेल्या रेल्वेमुळे कोल्हापूरचा विकास खुंटला आहे. विशेषत: नोकरदार, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे सर्व रेल्वे पूर्ववत सुरू कराव्यात.

- शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती