शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीपुढे सोने काय कामाचे !

By admin | Updated: November 8, 2014 00:24 IST

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा : ‘समीर’च्या संवेदनशील मनाला भुयेकरांची बक्षीस देऊन दाद

आदित्य वेल्हाळ - कोल्हापूर --सध्याच्या मतलबी जगात रस्त्यात सापडलेले दहा रुपयेही कुणी परत करण्याचे सौजन्य दाखवत नाही. अशावेळी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार त्यांच्या घरी जाऊन देण्याची माणुसकी केशेपाडळी (ता. कऱ्हाड) येथील समीर पालकर या रिक्षाचालकाने दाखविली. स्वार्थी जगात अजूनही माणुसकीचा ओलावा जिवंत असल्याचे समीर यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले. भुये (ता. करवीर) येथील प्रदीप ऊर्फ समाधान नामदेव पाटील व उषा प्रदीप पाटील या नवदाम्पत्याच्या दुचाकीचा कराड येथील विजयनगरच्या हद्दीत भीषण अपघात झाला होता. हा अपघात समीर पालकर यांच्या समोरच घडला होता. या अपघातात प्रदीप पाटील हे जागीच ठार झाले होते, तर उषा पाटील या गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघातस्थळी अनेकांनी गर्दी केली होती, पण त्यांना तातडीने दवाखान्यात पोहोचविण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. समीरसह काही नागरिकांनी तेथून जाणाऱ्या गाड्या थांबविण्याचा प्रयत्न केला. एकानेही गाडी न थांबविल्याने अखेर समीर यांनी आपल्या घरी जाऊन रिक्षा आणून सौ. पाटील यांना तातडीने कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. समीर यांनी जखमी अवस्थेतील सौ. पाटील यांना दवाखान्यात नेल्याने त्यांच्या रिक्षात रक्त सांडले होते. दुसऱ्या दिवशी रिक्षा साफ करताना समीर यांच्या पत्नीला दीड तोळ्यांचा सोन्याचा हार रिक्षात सापडला. त्यांनी समीरना ही गोष्ट सांगितल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता पाटील कुटुंबीयांना सोन्याचा सापडलेला हार परत करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाटील यांचा पत्ता माहिती नसल्याने हार द्यायचा कुठे हा प्रश्न समीर यांना पडला. अखेर दोन दिवसांनंतर पाटील कुटुंबीयांचा पत्ता मिळाला आणि समीर आपल्या कुटुंबीयांसहीत भुये येथे आले आणि प्रदीप पाटील यांच्या आईच्या हातात त्यांनी सापडलेला सोन्याचा हार दिला. ‘माझी सूनच परत आणून दिलीस,’ असा हंबरडा प्रदीप यांच्या आईने फोडला आणि सारा गाव भावूक नजरेने समीरकडे पाहू लागला. समीरने दाखविलेल्या माणुसकीला दाद देत व त्याच्या प्रामाणिकेतला सलाम करत माजी सरपंच अभिजित पाटील व गावकऱ्यांनी त्यांचा रोख बक्षीस देऊन सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली. उषा पाटील यांना वाचविण्यासाठी दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, पण दुर्दैवाने त्यांचे प्राण वाचवू शकलो नाही. रिक्षात सापडलेला दागिना परत करून आम्ही काही मोठे काम केले नाही. माणुसकीपुढे सोने काय कामाचे ? पाटील दाम्पत्याची शेवटची आठवण त्यांच्या कुटुंबीयांना परत करणे हेच माझे कर्तव्य होते. - समीर पालकर (रिक्षाचालक)