शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

‘हम दो, हमारे दो’मुळे लोकसंख्या वाढीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:39 IST

कोल्हापूर : मुलगाच हवा, मुलगी नकोच, या दोन्ही टोकांच्या भूमिकेपेक्षा ‘एक मुलगा, एक मुलगी’ असा मध्यममार्ग कोल्हापूरकरांनी जवळ केल्याचे ...

कोल्हापूर : मुलगाच हवा, मुलगी नकोच, या दोन्ही टोकांच्या भूमिकेपेक्षा ‘एक मुलगा, एक मुलगी’ असा मध्यममार्ग कोल्हापूरकरांनी जवळ केल्याचे कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेवरून दिसते. ‘हम दो, हमारे दो’ या भूमिकेमुळे जिल्ह्याचा जनन दरही घटला असून, तो राज्यात सर्वांत कमी आहे. दर घटला असला, तरी आजही कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचा भार स्त्रियांवर टाकला जात आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुष शस्त्रक्रियेचे प्रमाण खूपच कमी आहे.जननदरात घट होत असली तरी लिंगानुसार विभागणी केली, तर अजूनही मुलांनाच प्राधान्य दिले जात असल्याचेही वास्तव आहे. एका मुलीवर किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. गेल्या वर्षभरात १४ हजार ७६७ स्त्रियांनी, तर ३२१ पुरुषांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घेतली. त्यापैकी एका मुलीवर ८५ स्त्रियांनी, तर केवळ सहा पुरुषांनी शस्त्रक्रिया करून घेतली. याउलट एका मुलग्यावर १९८ स्त्रिया, तर १२ पुरुषांनी शस्त्रक्रिया केल्या. ‘एक मुलगा-एक मुलगी’ यावर मात्र वर्षभरात १0 हजार २0 स्त्रियांनी, तर १७३ पुरुषांनी शस्त्रक्रिया केल्या. यावरून आजही ‘एक मुलगा, एक मुलगी’ हे सूत्रच लोकप्रिय असल्याचे दिसते.लोकसंख्येचा भस्मासूर रोखण्यासाठी शासनाने ‘हम दो हमारे दो’, ‘हम दो हमारा एक’ असे घोषवाक्य घेऊन २0 वर्षांपूर्वी विशेष अभियान राबविले. एकेका कुटुंबात अर्धा एक डझन मुले-मुली असे चित्र असणाºया कोल्हापुरात या अभियानाने मानसिकता बदलण्याची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. शासनाचे प्रयत्न आणि सुशिक्षित कुटुंबांच्या वाढलेल्या संख्येमुळे या मानसिकता बदलाच्या प्रयत्नांना चांगले बळ मिळाले. परिणामी वेगाने वाढत चाललेल्या जननदराला ब्रेक लागला. गेल्या पाच वर्षांचा आलेख काढला, तर जननदरात वर्षागणिक घट होत चालल्याचे दिसते. देशाचा जननदर २.३ टक्के आहे, राज्याचा १.८ टक्के आहे, तर कोल्हापूर जिल्ह्णाचा १.६ टक्के इतका आहे.एक अपत्य असण्याचेही प्रमाण वाढलेशहरीकरण आणि करिअरला प्राधान्य देण्याच्या मानसिकतेमुळे एक अपत्य असणाºया पालकांचीही संख्या वाढली आहे. एक अपत्यावर ३६५ जणांनी शस्त्रक्रिया केली. दोन अपत्य असणाऱ्यांचे प्रमाण तब्बल नऊ हजार ९0९, तर तीन अपत्ये असणाºयांचे प्रमाण दोन हजार ८५७ आहे. एक अपत्याचा आग्रह असतानाच चार आणि पाच अपत्ये असल्याचेही दिसते. ३६१ शस्त्रक्रिया या चार अपत्यांवर, तर २९ या पाच अपत्यांवर झाल्या आहेत.कुटुंबनियोजनाचा भार स्त्रियांंवरचजिल्ह्यात गेल्या वर्षभरात झालेल्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेपैकी स्त्रियांच्या ६९ टक्के, तर पुरुषांच्या केवळ १0 टक्केच शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.त्यामुळे आजही स्त्रियांवरच कुटुंबनियोजनाचा भार असल्याचे दिसते. स्त्रियांच्या १९ हजार ३२१ च्या उद्दिष्टांपैकी १३ हजार ५२१, तर पुरुषांच्या १६0८ पैकी १७४ शस्त्रक्रिया वर्षभरात झाल्या आहेत.