शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वडगावला पालिकेचे मुख्याधिकारी पद रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : येथील वडगावमधील पालिका मुख्याधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : येथील वडगावमधील पालिका मुख्याधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. तीन महिन्यांपासून नवीन मुख्याधिकारी रुजू झाले नसल्याने जयसिंगपूर मुख्याधिकाऱ्यांकडे वडगावचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना अडचणी येत आहेत.

मुख्याधिकारी सुषमा कोल्हे-शिंदे यांची पदोन्नतीवर पिंपरी-चिंचवडच्या सहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाली. पालिका निवडणुकीपूर्वी शहरातील विकासकामे मार्गी लागावी, यासाठी पालिकेत मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक होण्यासाठी सत्तारूढ गट पाठपुरावा करत आहे. मात्र, त्यांना यश आलेले नाही. सध्या पेठवडगावचा अतिरिक्त पदभार हा सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जयसिंगपूर येथील मुख्याधिकारी टीना गवळी यांच्याकडे आहे. त्या कार्यक्षम असल्या, तरी त्यांना काही बंधने आहेत. त्यामुळे वडगावचा विकास खुंटला आहे तसेच येत्या वर्षभरात आपल्या सोयीच्या व आगामी पालिका निवडणुकीसाठी विकासकामे करताना सोयीचे व्हावे, यासाठी पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामकाजाकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात अतिक्रमणात वाढ तसेच कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, व्यापारी, नागरिकांमध्ये बेशिस्तपणा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर खमक्या मुख्याधिकाऱ्यांची गरज आहे.

अलिकडील काळात अतुल पाटील, सुषमा कोल्हे-शिंदे यांनी उत्कृष्ट काम करून आपल्या कामाची छाप पाडली आहे. शिंदे-कोल्हे यांनी शहराच्या सर्वांगिण विकासासाठी प्रशासकीय यंत्रणा गतिमान केली होती. कोरोना काळात प्रशासकीय यंत्रणा सजग करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. कोरोना जनजागृती, रुग्णांसाठी कोविड सेंटर उभारणी, अलगीकरण आणि विलगीकरण कक्ष उभारणी, आदी उपाययोजना केल्या होत्या. तर स्वच्छता अभियानामध्येही देशात क्रमांक पटकावण्यासाठी स्वतःसह प्रशासन, सामाजिक संस्था यांच्या मदतीने प्रयत्न केले होते.

यामुळे शहरवासीयांच्या अपेक्षा वाढल्या असताना, तीन महिने प्रभारी मुख्याधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे नागरिकांची कामे थांबली आहेत. कोणतेही काम असले की, आज प्रभारी मुख्याधिकारी नाहीत, उद्या या, असे सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.