शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

वारणेतून विसर्ग सुरू, राधानगरीतून थांबवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 20:02 IST

आधीच धरणांत सरासरी ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे; त्यातच मान्सून वेळेत दाखल होत असल्याने आणि आता वादळी पावसाने थैमान घातल्याने पाटबंधारे विभाग अधिक सतर्क झाला आहे. ‘वारणे’तून विसर्ग कायम असून, ‘राधानगरी’तून मात्र विसर्ग थांबविण्यात आला आहे. अन्य धरणांतून नियमित आवर्तने सुरूच असल्याने सर्वच नद्या दुथडी भरून वाहताना दिसत आहेत.

ठळक मुद्देवारणेतून विसर्ग सुरू, राधानगरीतून थांबवलाधरणात अजून सरासरी ३३ टक्के पाणीसाठा

कोल्हापूर : आधीच धरणांत सरासरी ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे; त्यातच मान्सून वेळेत दाखल होत असल्याने आणि आता वादळी पावसाने थैमान घातल्याने पाटबंधारे विभाग अधिक सतर्क झाला आहे. ‘वारणे’तून विसर्ग कायम असून, ‘राधानगरी’तून मात्र विसर्ग थांबविण्यात आला आहे. अन्य धरणांतून नियमित आवर्तने सुरूच असल्याने सर्वच नद्या दुथडी भरून वाहताना दिसत आहेत.

गेल्या आठवड्यात कमालीचा उष्मा होता; त्यामुळे पिकांची होरपळ वाढली होती. पाण्याची मागणी वाढल्याने नद्या बऱ्यापैकी कोरड्या पडलेल्या दिसत होत्या; पण जिल्ह्यात जूनच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाने वळवाच्या स्वरूपाने जोरदार एंट्री केली आहे. त्यामुळे शेतीसाठीच्या पाण्याची मागणी कमी झाली आहे. परिणामी, नद्याही काठोकाठ भरून वाहू लागल्या आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षीचा महापूर, अतिवृष्टी यांमुळे जानेवारीपर्यंत शेतीला पाण्याची मागणी राहिली नाही. त्यानंतर मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे उद्योगांचीही पाण्याची मागणी घटली. या सर्वांचा परिणाम म्हणून धरणातील पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. आजच्या घडीला सर्वच धरणांत सरासरी ३० टक्के पाणीसाठा आहे.

आजच्या घडीला ‘राधानगरी’तून ८०० क्युसेक विसर्ग सुरू होता; पण तो मंगळवारी सकाळी थांबवण्यात आला. ‘वारणे’तून नदीपात्रात १५३० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अन्य धरणांतील नियमित आवर्तने सुरू असून, अतिरिक्त विसर्ग अजून सुरू केलेला नाही.

 

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाईkolhapurकोल्हापूर