शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

वारणेतून विसर्ग सुरू, राधानगरीतून थांबवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 6:55 PM

आधीच धरणांत सरासरी ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे; त्यातच मान्सून वेळेत दाखल होत असल्याने आणि आता वादळी पावसाने थैमान घातल्याने पाटबंधारे विभाग अधिक सतर्क झाला आहे. ‘वारणे’तून विसर्ग कायम असून, ‘राधानगरी’तून मात्र विसर्ग थांबविण्यात आला आहे. अन्य धरणांतून नियमित आवर्तने सुरूच असल्याने सर्वच नद्या दुथडी भरून वाहताना दिसत आहेत.

ठळक मुद्देवारणेतून विसर्ग सुरू, राधानगरीतून थांबवलाधरणात अजून सरासरी ३३ टक्के पाणीसाठा

कोल्हापूर : आधीच धरणांत सरासरी ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे; त्यातच मान्सून वेळेत दाखल होत असल्याने आणि आता वादळी पावसाने थैमान घातल्याने पाटबंधारे विभाग अधिक सतर्क झाला आहे. ‘वारणे’तून विसर्ग कायम असून, ‘राधानगरी’तून मात्र विसर्ग थांबविण्यात आला आहे. अन्य धरणांतून नियमित आवर्तने सुरूच असल्याने सर्वच नद्या दुथडी भरून वाहताना दिसत आहेत.

गेल्या आठवड्यात कमालीचा उष्मा होता; त्यामुळे पिकांची होरपळ वाढली होती. पाण्याची मागणी वाढल्याने नद्या बऱ्यापैकी कोरड्या पडलेल्या दिसत होत्या; पण जिल्ह्यात जूनच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाने वळवाच्या स्वरूपाने जोरदार एंट्री केली आहे. त्यामुळे शेतीसाठीच्या पाण्याची मागणी कमी झाली आहे. परिणामी, नद्याही काठोकाठ भरून वाहू लागल्या आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षीचा महापूर, अतिवृष्टी यांमुळे जानेवारीपर्यंत शेतीला पाण्याची मागणी राहिली नाही. त्यानंतर मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे उद्योगांचीही पाण्याची मागणी घटली. या सर्वांचा परिणाम म्हणून धरणातील पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. आजच्या घडीला सर्वच धरणांत सरासरी ३० टक्के पाणीसाठा आहे.

आजच्या घडीला ‘राधानगरी’तून ८०० क्युसेक विसर्ग सुरू होता; पण तो मंगळवारी सकाळी थांबवण्यात आला. ‘वारणे’तून नदीपात्रात १५३० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अन्य धरणांतील नियमित आवर्तने सुरू असून, अतिरिक्त विसर्ग अजून सुरू केलेला नाही.

 

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाईkolhapurकोल्हापूर