शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईची प्रतिकृती मूर्तीच पूजेस वापरा

By admin | Updated: December 5, 2014 00:21 IST

पुरातत्त्व खात्याचा अहवाल; रासायनिक संरक्षण आवश्यक, पण वज्रलेप नकोच

कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीची दिवसेंदिवस झीज होत आहे. ती थांबविण्यासाठी मूर्तीला रासायनिक संरक्षण (केमिकल कॉन्झर्व्हेशन) करणे आवश्यक आहे. या मूर्तीस कोणत्याही कारणास्तव वज्रलेप करण्यात येऊ नये. तसेच देवीच्या मूर्तीची प्रतिकृती बनविण्यात येऊन तिचा दैनंदिन पूजेत वापर करण्यात यावा, असा अहवाल पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्यावतीने आज, गुरुवारी सादर करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व शासनाने २००२ साली अंबाबाईच्या मूर्तीला वज्रलेप करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी वज्रलेप समिती स्थापन केली. मात्र, देवीची मूर्ती वज्रलेप पेलण्याच्या स्थितीत नसल्याने श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी याविरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता. वर्षानुवर्षे यावर निर्णयच होत नाही, हे लक्षात आल्यानंतर अ‍ॅड. केदार मुनीश्वर यांनी सहा महिन्यांपूर्वी हे प्रकरण वैकल्पिक वाद निवारण केंद्राकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी केली होती. ती मान्य होऊन हे प्रकरण त्या केंद्राकडे वर्ग करण्यात आले. त्यावर आज सुनावणी ठेवण्यात आली होती. सुनावणीस पुरातत्त्व खात्याचे अधिकारी विलास वहाणे उपस्थित होते. त्यांनी पुरातत्त्व खात्याचा अहवाल सादर केला.या अहवालात असे म्हटले आहे की, अंबाबाईची मूर्ती काळ्या पाषाणात बनविलेली आहे. या मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे. शिवाय रोज त्यावर अलंकार व साडी नेसविण्याचे विधी होत असल्याने दिवसेंदिवस अधिकच झीज होत आहे. ती थांबविण्यासाठी मूर्तीचे रासायनिक संरक्षण करणे आवश्यक असून, हे काम भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण महासंचालनालयाच्या औरंगाबाद येथील रासायनिक शाखेकडून करून घेण्यात यावे. तसेच मूर्तीला वज्रलेप देण्यात येऊ नये, असे नमूद केले आहे. वज्रलेप निर्णयावर वज्रलेप समितीचा खोडा : श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांचा आरोपकरवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीच्या वज्रलेपावरील निर्णयात वज्रलेप समितीने खोडा घातला आहे. समितीतील सदस्यांनी वैकल्पिक वाद निवारण केंद्रात सुरू असलेल्या सुनावणीला अनुपस्थित राहून देवीबद्दल अनास्थाच दर्शविली आहे, असा आरोप श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला.अंबाबाईच्या मूर्तीच्या वज्रलेपाचा वाद सध्या वैकल्पिक वाद निवारण केंद्रात सुरू आहे. मात्र, आजवर झालेल्या सुनावणीस एकवेळ वगळता वज्रलेप समितीचा एकही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही. समितीचे सरकारी वकील अ‍ॅड. सुरेश कांबळे हे सुनावणीस उपस्थित राहण्यास टाळाटाळ करीत आहेत. दुसरीकडे, देवस्थानने वज्रलेप समितीच अस्तित्वात नसल्याचे पत्र सादर केले आहे. वास्तविक, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. नेवगी यांच्या निधनानंतर अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांकडे आले आहे. मध्यस्थांनादेखील प्रक्रिया पुढे चालविणे अवघड झाले आहे. केंद्राचे कामकाजच चालत नसल्याने उपस्थित राहणाऱ्या वादी-प्रतिवादींची कसलीही नोंद मध्यस्थांकडे होत नाही. सरकारी उदासीनतेमुळे एक महत्त्वाचा आणि भक्तांच्या जिव्हाळ्याचा निर्णय खोळंबला आहे. वज्रलेपाविरोधात यापूर्वी सादर झालेले अहवाल २००२ - श्री जगद्गुरू शंकराचार्र्य महासंस्थान, श्रृंगेरी या पीठाच्या शंकराचार्यांनी अंबाबाईची मूर्ती अतिप्राचीन आहे. यापूर्वीचा वज्रलेप परिणामकारक न झाल्याने पुन्हा वज्रलेप करणे युक्तिसंगत नाही, असे सांगितले आहे. २००२ : ज्येष्ठ भूगर्भतज्ज्ञ डॉ. एम. के. प्रभू यांनी दिलेल्या अहवालातही मूर्तीवर वज्रलेप म्हणजे तिच्यावर अतिरिक्त भार टाकण्यासारखे असून, तो पेलण्यास मूर्ती समर्थ नाही, असे म्हटले आहे. २००९ : पुण्याच्या ‘इरडॉस’ या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालातही मूर्तीला वज्रलेप नको, तर तिचे केमिकल कॉन्झर्व्हेशन करण्यात यावे, असेच सांगितले आहे. २०१४ : ‘आर्कालॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया’चे निवृत्त अधिकारी महांगीराज व त्र्यंबके यांनी केमिकल कॉन्झर्व्हेशनचा सल्ला दिला आहे.४२०१४ : मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनीही मूर्ती वज्रलेप पेलण्यास समर्थ नाही, असे नमूद केले.