शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धिकरणाचे ‘अशुद्ध, गलिच्छ’ केंद्र

By admin | Updated: November 26, 2015 00:33 IST

बालिंगा केंद्र बनले लावारिस : जलशुद्धिकरणाची प्रक्रिया उघड्यावरच; परिसरात कचरा, शेणाच्या ढिगाऱ्यांचे साम्राज्य

भारत चव्हाण ल्ल कोल्हापूरबालिंगा येथील ऐतिहासिक जलशुद्धिकरण केंद्र आता लावारिस बनले आहे. गेल्या ६७ वर्षांत शहराची तहान भागविणाऱ्या या जलशुद्धिकरण केंद्राकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे निसर्गरम्य परिसर आता कचरा आणि शेणाच्या ढिगाऱ्यात बुडाला आहे. कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आता गावठी श्वानांची व जनावरांची आश्रयस्थाने बनली आहेत. करोडोंची मिळकत आणि त्याहीपेक्षा नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा परिसर असा अस्वच्छ बनल्याने ‘स्मार्ट सिटी’कडे आपण कशी वाटचाल करणार, हाच प्रश्न आहे. कोल्हापूर शहराची तहान भागविण्यासाठी १९४९ मध्ये शहराच्या पश्चिमेला बालिंगा गावच्या हद्दीत सरकारने प्रतिदिन २४ लक्ष गॅलन क्षमतेचे जलशुद्धिकरण केंद्र उभारले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर हे जलशुद्धिकरण केंद्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली आले; परंतु राज्य सरकारच्या धोरणांत बदल होऊन शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली. त्याचाच भाग म्हणून हे जलशुद्धिकरण केंद्र १९९२ मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताब्यात आले. महानगरपालिकेच्या ताब्यात हे केंद्र आल्यानंतर त्याचा विस्तार झाला. त्याची शुद्धिकरणाची क्षमताही वाढविण्यात आली. सध्या जलशुद्धिकरणासाठी या केंद्रात आठ वाळूंचे वाफे (बेड) आहेत; परंतु केंद्रातील दुरुस्ती, देखभालीकडे प्रशासनाने म्हणाव्या तितक्या गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने या वाफ्यातील वाळूचे वाफे गाळात बुडाले आहेत. बऱ्याच ठिकाणी गळती लागली आहे तर लोखंडी जलवाहिन्या अक्षरश: गंजलेल्या आहेत. नदीतून घेतलेल्या पाण्यात वाऱ्याद्वारे वाहून आलेली बाहेरील धूळ मिसळते. जलशुद्धिकरण केंद्राच्या परिसरात एक सुंदर अशी बाग होती, परंतु ती आता गायब झाली आहे. बागेचे अवशेषही पाहायला मिळत नाहीत. काही एकरांचा हा परिसर तारेच्या कुंपणाद्वारे बंदिस्त असायचा. सुरक्षेची पूर्ण खात्री पटल्याखेरीज कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांनाही आतमध्ये सोडले जात नव्हते. खात्री पटल्यावरदेखील नाव, पत्ता, सही घेतली जात असे; परंतु या सर्व गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. परिसरातील तारेचे कुंपण, लोखंडी दरवाजे गायब झाले आहेत. कोणीही, कोणत्याही बाजूने सहजपणे जलशुद्धिकरण केंद्रात जाऊ शकते. खिडक्या गायब आहेत. काही ठिकाणी काचा फुटलेल्या आहेत. दरवाजे तर कुठेच दिसत नाहीत. इतके ते असुरक्षित बनले आहे. निवासस्थाने बनलीत जनावरांचे आश्रयस्थानजलशुद्धिकरण केंद्राच्या परिसरातच कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी सुबक कौलारू घरे बांधण्यात आली होती. त्यातील काही घरांत आजही कर्मचाऱ्यांची कुटुंबे राहतात; परंतु चार घरे तसेच अधिकाऱ्याचा बंगला आता गावठी कुत्र्यांचा, जनावरांचे आश्रयस्थान बनले आहे. काही मद्यपी लोकही त्याचा राजरोस वापर करतात. निवासस्थानांचे दरवाजे, खिडक्या, कौले चोरीस गेली आहेत. त्यातच गवत, झाडे-झुडपे वाढली आहेत. अतिशय सुसज्ज स्थितीतील ही घरे आता नामशेष होऊ लागली असून, अधिकाऱ्याचा बंगला तर भूतबंगला बनला आहे. कचरा, शेणाचे ढीग काही एकरांत पसरलेल्या जलशुद्धिकरण केंद्राच्या परिसरात आता कचऱ्याचे आणि जनावरांच्या शेणाचे ढीग साचले आहेत. बालिंगा गावचा सगळा कचरा येथेच टाकला जातो की काय, अशी शंका येते. शेणापासून गोवऱ्या थापल्या जात आहेत. जलशुद्धिकरण केंद्राकडून येणारा एक पाण्याचा ओहोळ रस्त्यावरच अडवून शेणी थापण्यासाठी हे पाणी वापरले जात आहे. एका बाजूला कचरा आणि दुसऱ्या बाजूला शेणाचे ढीग यामुळे परिसराचे प्रचंड विद्रुपीकरण झाले आहे. या भागाला पाणीपुरवठा ४बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातून कोल्हापूर शहराच्या बहुतांशी भागात पाणीपुरवठा करण्यात येतो. ४चंबुखडी टाकीतून सी व डी वॉर्डाला पाणीपुरवठा होतो. त्यामध्ये रंकाळा तलावापासून ते बी. टी. कॉलेज, बागल चौकापर्यंतच्या भाग येतो. ४आपटेनगर टाकीतून सानेगुरुजी, तुळजाभवानी मंदिर ते शिवाजी पेठ व मंगळवार पेठेच्या काही भागाला पाणीपुरवठा होतो.