शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळमधील उद्योग अडचणीत

By admin | Updated: September 1, 2015 23:26 IST

कामगारांचा प्रश्न गंभीर : तालुक्यातील औद्योगिक वसाहती मंदीच्या चक्रव्यूहात

संतोष बामणे - जयसिंगपूर  शिरोळ तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक उद्योग मंदीच्या चक्रव्युहात अडकले असून, या परिसरातील अनेक उद्योग बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे उद्योगावर अवलंबून असणारे व्यवसायिक व कामगार आर्थिक अरिष्टात सापडला असून, कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. इचलकरंजीतील संपाचा परिणामही शिरोळ तालुक्यात झाला आहे.तालुक्यात ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहत, छ. शाहू महाराज औद्योगिक वसाहत व पार्वती औद्योगिक वसाहत असून, याठिकाणी अनेक मोठे व लघु उद्योग आहेत. यामध्ये शेती उत्पादनावर आधारित, कापड उद्योग, मशिनरी, अॉटो पार्ट असे उद्योग आहेत. तसेच जिल्ह्यातील व परराज्यातील अनेक कामगार येथे काम करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मंदीचे सावट आल्याने विविध उद्योग अडचणीत सापडले आहेत. शंभरहून अधिक छोट्या-मोठ्या उद्योगांना काम नसल्यामुळे आर्थिक फटका बसत आहे.वसाहतीमध्ये छोटे-मोठे उद्योग असून, सर्व व्यवसाय एकमेकांवर अवलंबून आहेत. येथील माल सातासमुद्रापार पोहोचला आहे. तालुक्यामध्ये कामगारांची आर्थिक घडी बसविणाऱ्या या औद्योगिक वसाहतीला अवकळा लागली आहे. शासनाने वीज दरवाढ केल्याने उद्योगांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येथील उद्योग परराज्यात स्थलांतरीत होत आहेत. जागतिक मंदीमुळे शिरोळ तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये उत्पादित होणारे स्पेअरपार्टचे काम कमी झाल्यामुळे छोटे उद्योग बंद पडत आहेत. यामुळे यावर अवलंबून असणारे घटक आर्थिक अरिष्टात सापडले आहेत. शासनाने वीज बिलाबाबत लवकर तोडगा काढला पाहिजे, अन्यथा उद्योग इतरत्र स्थलांतरित होण्याची शक्यता आहे.- दिलीप पाटील-कोथळीकर, अध्यक्ष, ल. क. अकिवाटे वसाहतऔद्योगिक क्षेत्रासाठी सध्या असणारी वीज बिलाची आकारणी न परवडणारी आहे. शासनाने वीज बिलाची दरवाढ कमी करून औद्योगिक वसाहतींना चालना देण्याची गरज आहे. उद्योग टिकले तरच कामगार टिकतील, अन्यथा बेरोजगारीची समस्या वाढण्याची शक्यता आहे. डॉ. अशोकराव माने, अध्यक्ष, शाहू औद्योगिक वसाहतइचलकरंजी येथील कामगारांच्या संपाचा यड्रावमधील पार्वती इंडस्ट्रीजवरही परिणाम झाला आहे. वस्त्रोद्योग हे एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणारे उद्योगही बंद पडले आहेत. यामुळे कामगार व मालक दोघेही भरडे जात असून, यावर तोडगा काढण्याची गरज आहे.- सचिन मगदूम, यंत्रमाग उद्योजक, यड्राव