शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

पाणी अडविण्याच्या बंधाऱ्यावरून अवजड वाहनांची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST

सदाशिव मोरे । आजरा आजरा तालुक्यात हिरण्यकेशी व चित्री नदीवर १५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ५० वर्षांपूर्वी बांधले आहेत. १५ ...

सदाशिव मोरे । आजरा

आजरा तालुक्यात हिरण्यकेशी व चित्री नदीवर १५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ५० वर्षांपूर्वी बांधले आहेत. १५ पैकी १२ बंधाऱ्यांवरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. बंधाऱ्यांचे बांधकाम कमकुवत झाले असून, प्रतिवर्षी अनेक बंधाऱ्यांचे पिलर कोसळत आहेत. पाणी अडविण्यासाठी बांधलेल्या बंधाऱ्यांवरून अवजड वाहनांची धोकादायक सुरू असलेली वाहतूक थांबविण्याची गरज आहे. आजरा तालुक्यात सरासरी १५० मि.मी. पाऊस पडतो. पावसाळ्यात नेहमी हिरण्यकेशी व चित्री नदी धोक्याच्या पातळीबाहेरून वाहत असतात. अतिवृष्टीच्या काळात नदीच्या पाण्याचा वेग जास्त असतो, तर बंधाऱ्यांना मोठ्या ओंडक्यांसह झुडपेही येऊन अडकत असतात. त्यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण होतो. अतिवृष्टीच्या काळात आठ-आठ दिवस सर्वच बंधारे पाण्याखाली असतात. बंधाऱ्यांवरून वाळू, वीट, सिमेंट, ऊस, लाकूड यासह अवजड वस्तूंची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. बंधाऱ्यांवर पडलेले खड्डेही बुजविले जात नाहीत. हिरण्यकेशी नदीवर पाटबंधारे विभागाने साळगाव, देवर्डे, दाभील, सुळेरान, ऐनापूर, भादवण, हाजगोळी, चांदेवाडी, गजरगाव याठिकाणी, तर चित्री नदीवर परोली येथे बंधारे बांधले आहेत. स्थानिक स्तर जलसंधारण विभागाने किटवडे, शेळप, सोहाळे याठिकाणी बंधारे बांधले आहेत. यापैकी चांदेवाडी, सुळेरान व सोहाळे या बंधाऱ्यावरून फक्त नागरिकांची ये-जा सुरू आहे, तर अन्य सर्व बंधाऱ्यांवरून धोकादायकपणे वाहनांची वाहतूक सुरू आहे.

-

* बंधाऱ्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची गरज

बंधाऱ्यावरील अवजड वाहतुकीमुळे पिलर कमकुवत झाले आहेत, तर बंधाऱ्यावर पडलेले खड्डेही भविष्यात धोका निर्माण करू शकतात. ५० वर्षांपूर्वी बांधलेल्या बंधाऱ्यांचे मजबुती व क्षमता तपासणे, स्ट्रक्चरल आडिट होणे गरजेचे आहे. --------------------------------

* साळगावचा पिलर कोसळला, तर हाजगोळी बंधाऱ्यावर खड्डा

चालू वर्षी साळगाव बंधाऱ्याचा एका पिलरचा भाग कोसळला आहे, तर हाजगोळी बंधाऱ्यावर मधोमध मोठा खड्डा पडला आहे. यामुळे या दोन्हीही बंधाऱ्यांना धोका आहे. पाणी कमी झाल्याशिवाय या दोन्ही बंधाऱ्यांची दुरुस्ती होऊ शकत नाही; पण तत्पूर्वी एखादी दुर्दैवी घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. -----------------------------------

* साळगाव बंधाऱ्याशेजारील पर्यायी पुलाचे भिजत घोंगडे

साळगाव बंधाऱ्यावर पावसाळ्यात आठ-आठ दिवस पाणी असते. नागरिकांना सोहाळे मार्गे जावे लागते. बंधाऱ्याशेजारील पूल बांधण्यासाठी निधी मंजूर झाला. भूमिपूजनही झाले; पण बांधकामापूर्वीच आलेला निधीही परत गेल्यामुळे पर्यायी पूल कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ------------------------------

* फोटो ओळी : हिरण्यकेशी नदीवरील दाभील बंधारा.

क्रमांक : ०१०२२०२१-गड-०३