शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांचा विचारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:10 IST

कोल्हापूर : कोरोनामुळे अनेक जण बेरोजगार झाले. सर्वसामान्यांसह विविध घटकांची आर्थिक स्थिती बिघडली. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये या घटकांना ...

कोल्हापूर : कोरोनामुळे अनेक जण बेरोजगार झाले. सर्वसामान्यांसह विविध घटकांची आर्थिक स्थिती बिघडली. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये या घटकांना मदत होण्याची अपेक्षा होती. मात्र, त्याचा विचार केंद्र सरकारने केलेला नाही. अर्थसंकल्प गतिमान नसून अपेक्षाभंग करणारा आहे, अशा प्रतिक्रिया सोमवारी अर्थक्षेत्रातील तज्ज्ञ, व्यापारी, व्यावसायिकांनी व्यक्त केल्या.

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने शिवाजीराव देसाई सभागृहात केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत चर्चासत्र घेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प हा आगळावेगळा असेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात अपेक्षाभंग करणारा हा अर्थसंकल्प आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी लोकांसह सरकारचा खर्च वाढविण्याच्या दृष्टीने तरतुदी करण्याची गरज होती; पण त्याबाबत काहीच झालेले नाही. शेतीक्षेत्रासाठी ठोस काही नसल्याचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील काही संस्थांच्या खाजगीकरणाचा निर्णय धोरणात्मक चौकटीत राहून घेतला आहे. अर्थसंकल्प गतिमान नाही. संकल्प करून ‘अर्थ’ मांडला असल्याचे अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. विजय ककडे यांनी सांगितले. करांच्या दरामध्ये बदल केलेला नाही. स्टार्टअप, उद्योगांना पूरक ठरणारे, तर करचुकवेगिरी करणाऱ्यांना वॉर्निंग देणारे बजेट असल्याची प्रतिक्रिया सीए असोसिएशन कोल्हापूरचे खजानिस चेतन ओसवाल यांनी व्यक्त केली. आनंद माने, शांताराम सुर्वे, नरेंद्र माटे, प्रदीपभाई कापडिया, कमलाकार बुरांडे, महेश धर्माधिकारी, आदींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. धनंजय दुग्गे, प्रशांत शिंदे, अनिल धडाम, अरुण सावंत, आदी उपस्थित होते. प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री यांनी स्वागत केले. कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी प्रास्ताविक केले. खजानिस हरिभाई पटेल यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार यांनी आभार मानले.

चौकट

तर किलोमीटरचा दगड मागे घ्यावा लागेल

कच्चा तेलाचे दर कमी असताना पेट्रोल- डिझेलचे वाढणारे दर पाहता वाहनांचे अव्हरेज वाढविण्यासह किलोमीटर दर्शविणारा दगड थोडा मागे घ्यावा लागेल, अशी टीका आनंद माने यांनी केली. मुंबई- कन्याकुमारी कॉरिडॉरची मागणी फसवी असल्याचे त्यांनी सांगितले.