शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
4
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
5
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
6
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
7
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
8
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
9
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
10
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
11
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
12
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
13
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
14
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
15
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
16
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
17
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
18
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
19
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
20
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप

Kolhapur: जिल्हाधिकारी अध्यक्ष, पण तरीही पर्यावरण समिती कागदावरच; स्थापनेपासून एकही बैठक नाही 

By संदीप आडनाईक | Updated: July 5, 2025 19:22 IST

पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये नाराजी

संदीप आडनाईककोल्हापूर : जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांच्यासह इतरही शासकीय अधिकारी या समितीमध्ये सदस्य असताना जिल्हा पर्यावरण समिती कागदावरच आहे. सहा महिन्यांतून एकदा बैठक घेण्याचा निर्णय असताना नव्याने स्थापन झालेल्या या समितीची एकही बैठक झालेली नाही. याला या समितीचे सदस्य उदय गायकवाड, हेमंत आराध्ये, रामेश्वर पतकी आणि देवेंद्र खराडे यांनीही दुजोरा दिला आहे.जिल्ह्यात पर्यावरणविषयक जनजागृती, पर्यावरणाशी संबंधित सर्व विभागांशी समन्वय करून पर्यावरणीय समस्या शोधून त्यावरील उपाययोजनांची शिफारस करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने जिल्हा पातळीवर जिल्हा पर्यावरण समितीचे गठण करण्याबाबत १९८८ मध्ये निर्देश दिले आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उद्योग अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा जनसंपर्क व माहिती अधिकारी, जिल्हा वन अधिकारी, अध्यक्ष नामनिर्देशित पर्यावरण क्षेत्रातील दोन तज्ज्ञ प्रतिनिधी, तसेच पर्यावरण क्षेत्रात काम करणारे अशासकीय सेवाभावी संस्थांचे दोन प्रतिनिधी आणि सर्व आमदार हे सदस्य असतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सदस्य सचिव असतात.शासन निर्णयाला केराची टोपलीजिल्हा पर्यावरण समितीची बैठक कमीतकमी ६ महिन्यांतून एकदा व्हावी, बैठक सामान्यत: जानेवारी आणि मे अशी महिन्यातून दोनवेळा आयोजित करावी, बैठकीचे इतिवृत्त पर्यावरण विभागाला सादर करावे, असेही निर्णयात म्हटलेले आहे. या निर्णयाला जिल्ह्यात केराची टोपली दाखविली आहे, अशी स्थिती आहे.

नियुक्त झाल्यापासून या समितीची एकही बैठक झालेली नाही. उलट विभागीय आयुक्त, पर्यावरण मंंत्रालय, संबंधित खात्याचे मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन यासंदर्भात पत्रव्यवहारही केला. ही बैठक न झाल्याने प्रशासकीय अधिकारी याबाबत गंभीर नाहीत, हेच सिद्ध होते. -रामेश्वर पतकी, सदस्य, जिल्हा पर्यावरण समिती, कोल्हापूर. 

वर्षात समितीचे कामकाज व कार्यकक्षा निश्चित केली असताना, स्थापन झाल्यापासून या समितीची एकही बैठक झालेली नाही. याविषयावर काम कसे करायचे. -देवेंद्र खराडे, सदस्य, जिल्हा पर्यावरण समिती, कोल्हापूर.

समिती सदस्यांची किमान ओळख व्हावी, कामाची दिशा ठरवावी यासाठी समितीची बैठक गरजेची आहे. -उदय गायकवाड, सदस्य, जिल्हा पर्यावरण समिती, कोल्हापूर.