शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘टेकवाडी’चा हट्ट नडतोय

By admin | Updated: August 1, 2014 00:36 IST

पुनर्वसनाला प्रतिसादच नाही : पुरामुळे जमीन खचण्याची शक्यता

कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील अख्खं माळीण गाव डोंगर कोसळल्यानंतर गाडलं गेल्याची घटना घडली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील टेकवाडी गाव चर्चेत आलंय. तुफान पाऊस, कुंभी व धामणी नद्यांना येणाऱ्या पुराच्या पाण्याचा वेढा आणि डोंगरावर असलेलं गाव खचण्याची शक्यता अशी संकटे असतानाही गावातच राहण्याचा हट्ट टेकवाडीतील ६७ कुटुंबांना नडतोय. वेळ, काळ आणि कोणतंही संकट सांगून येत नाही, तरीही गेल्या काही वर्षांपासून ग्रामस्थांनी प्रशासनाच्या प्रयत्नांना दाद न देता तेथेच राहण्याचा हट्ट सोडलेला नाही.कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर तिसंगीपैकी टेकवाडी या गावात ६७ कुटुंबे राहतात. या गावात १५० हून अधिक जनावरेही आहेत. प्रत्येक पावसाळ्यात कुंभी आणि धामणी नदीला पूर आला की, गाव पुराच्या पाण्याने चारही बाजूने वेढले जाते. यामुळे गावाचा संपर्कच तुटतो. गावाकडे जाणारे रस्ते बंद होतात. यावर्षीच्या पावसाळ्यात तीन वेळा गावाचा संपर्क तुटला आहे. तिसंगीमार्गे जाणाऱ्या एका बंधाऱ्यावरून गावकऱ्यांची जाण्या-येण्याची सोय होते, पण तेही धोकादायक आहे. जोपर्यंत पुराचे पाणी ओसरत नाही, तोपर्यंत ग्रामस्थ गावातच अडकून पडतात. टेकवाडी हे गाव उंच डोंगरावर आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांच्या पुराचे पाणी कधीही गावात शिरत नाही; परंतु पावसाळ्यात जेव्हा कुंभी व धामणी नद्यांना पूर येतो तेव्हा पुराचे पाणी या डोंगराच्या खालच्या बाजूवर येऊन आदळते. पाण्याच्या दाबामुळे डोंगराचा काही भाग खालून निखळत चालला आहे. गगनबावडा तहसीलदार कार्यालयाने ही बाब लक्षात आल्यापासून टेकवाडीच्या ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याचा पर्याय पुढे आणला आहे. तहसीलदार विकास भालेराव यांनी दोनवेळा ग्रामसभा घेऊन गावाच्या पुनर्वसनाचा प्रयत्न केला; परंतु गावकऱ्यांनी तिसंगी गावाजवळ पुनर्वसन करावे, अन्यथा नको, अशी भूमिका घेतली. घरे, शेतजमीन सोडून अन्यत्र जाण्यास त्यांचा ठाम विरोध आहे. त्यामुळे टेकवाडीची पुनर्वसन प्रक्रिया मध्येच थांबली आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक वर्षी पावसाळ्यात तहसीलदार कार्यालयातर्फे तात्पुरत्या पुनर्वसनाचे नियोजन केले जाते. यंदाही तिसंगी महाविद्यालयातील काही खोल्यांत या ग्रामस्थांची तात्पुरत्या निवाऱ्याची, तसेच टॉयलेटची सोय केली असतानाही ग्रामस्थांनी नकार दिला आहे.टेकवाडीच्या गावकऱ्यांना दोन ग्रामसभा घेऊन संभाव्य धोका आणि पुनर्वसन याबाबत माहिती दिली आहे; परंतु त्यांचे असहकार्य मिळत आहे. गावाला पावसाळ्यात धोका आहे. पुराच्या पाण्याने गाव पूर्ण वेढले जाते. यंदाही पाण्याने वेढा दिलाय. त्यासाठी गावकऱ्याच्या सोयीसाठी एक फायबर मोटारबोट दिली आहे. धान्य व रॉकेलचा पुरवठा केला जातोय. पुराचे पाणी कधीही गावात शिरत नसले तरी डोंगर खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. - विकास भालेराव, तहसीलदार, गगनबावडा