शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

तुडीये येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीची भू-मापकाकडून मोजणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST

माणगाव : अनेक वर्षे रखडलेल्या तिलारी (ता. चंदगड) येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विस्थापनाचा प्रश्न रखडला आहे. त्यामुळे तुडीये, हाजगोळी व ...

माणगाव : अनेक वर्षे रखडलेल्या तिलारी (ता. चंदगड) येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विस्थापनाचा प्रश्न रखडला आहे. त्यामुळे तुडीये, हाजगोळी व खालसा म्हाळुंगे येथील प्रकल्पग्रस्तांनी वीजनिर्मिती केंद्राला होणारा पाणी पुरवठा बंद करण्याची आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर पुनर्वसन विभागाकडून वन विभागाच्या जमिनीची मोजणी सुरू झाल्याने प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

तिलारी प्रकल्पग्रस्त भागातील तुडीये, हाजगोळी, खालसा म्हाळुंगे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी तिलारी धरणात गेल्या. या विस्थापित शेतकऱ्यांना वन विभागाची राखीव जमीन देण्याचे स्पष्ट आदेश असताना वेळोवेळी शेतकऱ्यांना केवळ आशा दाखविण्यात आली. आंदोलने, विनंत्या, अर्ज करूनही शासन दरबारी दाद घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बंधाऱ्यातून जाणारे पाणी अडविण्याची भूमिका घेतल्याने अखेर शासनाने १९८६च्या नकाशाप्रमाणे शेतकऱ्यांना वनजमिनी देण्याचा निर्धार केला. मोजणी अधिकाऱ्यांनी भू-संपादन ज्याप्रमाणे केले आहे, त्याप्रमाणे मोजणी सुरू केली असून, चिठ्ठी टाकून मोजणी सुरू व्हावी, अशी अपेक्षा आहे.

शिवाय धरणग्रस्त नसतानासुद्धा बेकायदेशीररित्या भू-संपादन केलेल्या लोकांना अशापद्धतीने मोजणी केल्याने आश्रय मिळतो की काय? अशी शंका निर्माण होत आहे. खरोखर धरणग्रस्त असणाऱ्यांनाच १९८६च्या नकाशाप्रमाणे भू-मापकाडून जमिनींची मोजणी सुरू व्हावी, अशी अपेक्षा आहे.

उपअधीक्षक भूमिअभिलेख यांनी जमीन मोजून देण्यासाठी पत्र दिले असतानाही मोजणी खात्याकडून वारंवार टाळाटाळ होत होती. सलग पाचवेळा मोजणीच्या ठिकाणी अधिकारी हजर झाले नव्हते. भूमी अभिलेख, जिल्हा पुनर्वसन, तिलारी-सिंधुदुर्ग पाटबंधारे मंडळ यांनी शेतकऱ्यांना केवळ आश्वासन देत १९८६पासून जमिनी ताब्यात देण्यास टाळाटाळ केली होती. अखेर तिलारी वीजनिर्मिती केंद्राला जाणाऱ्या बंधाऱ्यातील पाणी अडविण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी घेतल्याने अखेर शासनाने वन विभागाच्या जमिनींची मोजणी सुरू केली आहे.

याकामी प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष खाचू पाटील, अशोक पाटील, एम. बी. पाटील, मधुकर पाटील, कल्लाप्पा पाटील, बाबू पाटील, नारायण पाटील, गोविंद पाटील आदींनी शासन दरबारी जावून जमिनी मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते.