शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

स्टार १०४२ : केंद्र सरकारच्या अनास्थेने टीबी रुग्णांचे पोषण लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:29 IST

कोल्हापूर : क्षयरोग अर्थात टीबीच्या रुग्णांना पौष्टिक आणि आरोग्याला लाभदायक आहार घेता यावा यासाठी श्रयरोग कार्यालयाकडून प्रति महिना पोषण ...

कोल्हापूर : क्षयरोग अर्थात टीबीच्या रुग्णांना पौष्टिक आणि आरोग्याला लाभदायक आहार घेता यावा यासाठी श्रयरोग कार्यालयाकडून प्रति महिना पोषण आहार भत्ता म्हणून दरमहा ५०० रुपये दिले जातात. मात्र, केंद्र सरकारकडून वर्षभर अनुदानच येत नसल्याने रक्कम खात्यावर वर्गच करता येत नाही. सरकारी अनास्थेमुळे टीबी रुग्णांसाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा मूळचा उद्देशच बाजूला पडला असून स्वत:चे पोषण स्वत:च करत आहेत.

क्षयरोग हा संक्रमक रोग असून क्षयरोगीच्या संपर्कात येण्याने तो वेगाने पसरतो. जंतू शरीरात प्रवेश केल्यानंतर फुप्फुसावर मारा करतात. मेंदू व मूत्रपिंडामध्ये देखील हा रोग पसरू शकतो. त्यामुळे साधारण लक्षणे दिसताच वेळीच उपचार घेणे हेच जास्त परिणामकारक ठरते. क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी लागण झालेल्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे महत्त्वाचे असते; पण बहुधा गरिबांमध्येच टीबी रुग्णाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्यांना चांगला आहार मिळेल याची शक्यता नसते. ही गरज ओळखूनच शासनाने निक्षय पोषण आहार योजना सुरू केली आहे. त्यातून रुग्णाचे टीबीचे निदान झाल्यापासून ते उपचार घेऊन बरे होण्यापर्यंत दरमहा प्रति व्यक्ती ५०० रुपये रुपये अनुदान दिले जाते; पण शासनाकडून दर महिन्याला अनुदान येत नसल्याने सहा महिन्यांतून एकदा तीन हजार रुपये असे खात्यावर वर्ग केले जातात; पण ही रक्कम मुळात तोकडी आहे आणि सहा महिने थांबावे लागत असल्याने पोषण आहार कसा घ्यायचा याची विवंचना या रुग्णांना असते. चालू वर्षी तर गेल्या वर्षभरापासून अनुदानच आलेले नाही.

जिल्ह्यातील लाभ घेणारे टीबीचे रुग्ण

२०१८ मध्ये लाभ घेतलेले : १४९०

२०१९ मध्ये लाभ घेतलेले : १७८४

यावर्षी आतापर्यंतचे लाभार्थी : ५८५

२) जिल्ह्यासाठी प्रति लाभार्थी ५०० रुपयांप्रमाणे दरवर्षी ६० लाख रुपये लागतात. गेल्या वर्षी एवढीच रक्कम आली होती, यावर्षीदेखील तेवढी मागणी केली आहे; पण आजअखेर यातील एक रुपयादेखील आलेला नाही.

३) टीबीची लक्षणे काय (बॉक्स)

दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा पण संध्याकाळी वाटणारा ताप, थुंकीतून रक्त पडणे, छातीत दुखणे, रात्री घाम येणे.

४) जास्तीत जास्त २८ महिन्यांत टीबीमुक्त (कोणत्या प्रकारचा टीबी किती दिवसांत बरा होतो याचा बॉक्स)

क्षयरोगाचा पिकार व तीव्रता यावर उपचार ठरवले जातात. साधारपणे हा काळा सहा महिने ते तीन वर्षांचाही असतो. यात लेटेस्ट इन्फेक्शन असल्यास सहा महिन्यांसाठी एकाच प्रकारचे औषध वापरले जाते. सक्रिय पल्मनरी संक्रमण असल्यास सहा ते नऊ महिन्यांपर्यंत संयोजन थेरपी वापरली जाते. एक्स्ट्रा पल्मनरी संक्रमण हा तीव्र स्वरूपाचा असल्याने ६ ते ९ महिन्यांपर्यंत एकापेक्षा जास्त औषधांचा वापर होतो. औषध प्रतिरोधक संक्रमण या प्रकारात उपचार करताना जिवाणू औषधांना प्रतिरोध करणाऱ्या करणाऱ्या थेरपीचा वापर होतो. यासाठी १८ महिने ते ३ वर्षांचा कालावधी लागतो.

५) उपचारार्थ नाेंद झालेल्या सर्वांना निक्षय पोषण आहार मिळावा यासाठी नोंदणीची प्रक्रिया काटेकोरपणे राबवली जाते. सरकारीसह खासगी दवाखान्यांना देखील अनुदानाची रक्कम दिली जाते; पण अनुदान येण्यास मागे पुढे होत असल्याने ते येईल तसे एकदम दिले जात आहे.

-डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा क्षयरोग अधिकारी