शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीराव नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद शक्य

By admin | Updated: November 21, 2015 00:23 IST

पक्षवाढीसाठी निवड : पालकमंत्रीपदही मिळण्याची शक्यता; भाजपच्या कोअर कमिटी सूत्रांकडून दुजोरा

संजय घोडे-पाटील -- कोकरूड--सांगली जिल्ह्याचा मंत्रिपदाचा अनुशेष शिराळ्याचे आ. शिवाजीराव नाईक यांच्यारूपाने भरून निघत असल्याचे संकेत भाजपच्या कोअर कमिटीतील वरिष्ठ सूत्रांकडून मिळाले. येत्या शुक्रवार, दि. २७ रोजी शपथविधी होण्याचेही संकेत आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असून, या वृत्ताला भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही दुजोरा दिला आहे.आ. शिवाजीराव नाईक सांगली जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते असून, चार वेळा आमदार व युती शासनाच्या कालावधित राज्यमंत्रीपद त्यांनी भूषविले आहे. स्वच्छ चारित्र्य, राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. शिराळ्यापासून जतपर्यंत कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या मागे उभी राहू शकते, हे भाजपच्या सर्व वरिष्ठांनी ओळखले असून, पक्षवाढीच्यादृष्टीने त्यांची निवड योग्य असल्याचे बोलले जात आहे. पक्षात असणारे विरोधक हे गेल्या वर्षभरापासून त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यातही यशस्वी होत होते. आता मात्र या सर्व अडथळ्यांवर मात करत नाईक यांनी मंत्रिपदाची बाजी मारली आहे. भाजपचे खासदार संजय पाटील, आ. विलासराव जगताप, आ. सुधीर गाडगीळ यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी नाईक यांचे ज्येष्ठत्व या पातळीवर नाईक यांचेच नाव मंत्रिपदासाठी योग्य असल्याचा गोपनीय अहवाल पक्षाला दिला आहे. पक्षातील दुसरे ज्येष्ठ आ. सुरेश खाडे हे भाजपचे निष्ठावंत असून एक वेळा त्यांनी जतमधून अपक्ष म्हणून विजय मिळविला आहे. तसेच दोन वेळा पक्षाच्या तिकिटावर यश संपादन केले आहे. त्यांना हे यश वेगवेगळ्या परिस्थितीत व घटना या अनुषंगाने जरी मिळाले असले तरी, त्यांचा जिल्ह्याचा आवाका व अनुभव त्यादृष्टीने कमी आहे.गडकरींकडून आश्वासनाची पूृर्तता शक्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कामेरी (ता. वाळवा) येथील सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, शिवाजीरावांना निवडून द्या, मी त्यांना कॅबिनेट मंत्री करतो, असे आश्वासन जाहीर सभेत दिले होते. याला वर्षाचा कालावधी लोटला असून आता तिसऱ्यांदा विस्तार होताना या शब्दाची पूर्तता होत आहे. कोण काय म्हणाले?शिवाजीराव नाईक व मिरजेचे सुरेश खाडे या दोन आमदारांपैकी एकाला संधी मिळणार आहे. ज्यांना ही संधी मिळणार, त्याला कोअर कमिटी शपथविधीच्या आदल्या दिवशी निमंत्रण देणार आहे. त्याचवेळी जिल्ह्याला मंत्री कोण हे स्पष्ट हाईल.- राजाराम गरूड, भाजप जिल्हाध्यक्ष निवडणुकीत भाजपला जिल्ह्यात सर्वाधिक यश मिळाले असून, आम्ही सर्वचजण ज्याला हे पद मिळेल त्याच्या पाठीशी उभे राहून पक्षाची ताकत वाढविणार आहोत. एक खासदार व चार आमदार यापुढेही आम्ही एकदिलाने काम करणार आहोत.- आ. शिवाजीराव नाईक