शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाचा निकाल महापौर निवडीस बंधनकारक

By admin | Updated: June 30, 2015 00:47 IST

स्थगिती नाही : माळवी यांच्या अर्जावर उच्च न्यायालयाचा निकाल

कोल्हापूर : माजी महापौर तृप्ती माळवी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या आदेशावर सोमवारी (दि. ६) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. दरम्यान, शनिवारी होणाऱ्या नव्या महापौरांच्या निवडीस स्थगिती देण्याची मागणी माळवी यांनी सोमवारी उच्च न्यायालयाकडे अर्जाद्वारे केली. महापौर निवडीस स्थगिती न देता याप्रकरणी न्यायालयाचा निकाल नव्या महापौरांवर बंधनकारक असेल, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायाधीश अभय ओक यांनी दिला. त्यामुळे माळवी यांच्या बाजूने निकाल लागल्यास नवीन महापौरांचा कार्यकाल आपोआपच तत्काळ खंडित होणार आहे. तृप्ती माळवी यांच्यावर स्वीय सहायकामार्फत १६ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या संशयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी महिन्यात कारवाई केली. मात्र, यानंतरही माळवी यांनी महापौरपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. सभागृहाने ७२ विरुद्ध ० असा, ठराव करीत माळवी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली. यानुसार राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सुनावणी घेऊन माळवी यांचे नगरसेवकपद रद्द करीत आहे, त्या अनुषंगाने महापौरपदही रद्द केले जात असल्याचा निकाल १७ जूनला दिला. नगरसेवकपद रद्द करीत असल्याचे आदेश मिळताच माळवी यांच्या सर्व सेवा महापालिका प्रशासनाने तत्काळ खंडित केल्या. राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात माळवी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, विभागीय आयुक्तांनी शनिवारी महापौर निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले. महापौर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने नवीन महापौर निवड स्थगित करावी, अशी मागणी तृप्ती माळवी यांनी उच्च न्यायालयाकडे केली. निवडीस स्थगिती न देता न्यायालयाने माळवी प्रकरणी होणारा निवाडा हा नवीन महापौर निवडीस बंधनकारक राहील, असे आदेश दिले. सोमवारी किंवा ज्यावेळी न्यायालयाचा निकाल माळवी यांच्या बाजूने सकारात्मक लागल्यास नवीन महापौरपद तत्काळ रद्दबादल ठरणार आहे. (प्रतिनिधी)इच्छुकांची धाकधूक वाढलीकॉँग्रेसतर्फे महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पदासाठी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे. आता नाही तर कधीच पुन्हा संधी नाही, असे म्हणत सर्वच इच्छुक कामाला लागले आहेत. माळवी यांचा राजीनामा लांबल्याने दहा महिन्यांचे महापौरपद अवघ्या पाच महिन्यांवर आले. आता निवडीचा कार्यक्रम झाल्यानंतर न्यायिक प्रक्रियेत महापौरपद अडकले आहे. न्यायालयाचा संपूर्ण निकाल लागेपर्यंत नव्या महापौरांवर टांगती तलवार असणार आहे.