शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

महाडमध्ये कोल्हापुरातील व्हाईट आर्मीतर्फे बचावकार्य सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 19:17 IST

कोल्हापुरातील व्हाईट आर्मीचे जवान विनायक भाट, नितेश वनकोरे, टीम लीडर प्रदीप ऐनापुरे यांच्या नेतृत्वाखाली १५ लोकांचे पथक  पहाटेपासून महाडमध्ये बचावकार्य करत आहेत अशी माहिती व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी दिली आहे.

ठळक मुद्दे‘व्हाईट आर्मी’चे पथक धावले महाडलामाणुसकीची मदत : पंधरा जवान रवाना

महाड/कोल्हापुर : कोल्हापुरातील व्हाईट आर्मीचे जवान विनायक भाट, नितेश वनकोरे, टीम लीडर प्रदीप ऐनापुरे यांच्या नेतृत्वाखाली १५ लोकांचे पथक पहाटेपासून महाडमध्ये बचावकार्य करत आहेत.

पहाटे पाच वाजल्यापासून कोल्हापूरचे व्हाईट आर्मी, त्याचबरोबर एनडीआरएफ आणि स्थानिक इतर एनजीओ यांच्यासोबत सायंकाळी सहा वाजेपर्यंत १४ मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्याच बरोबर विनायक भाट याने ६ वर्षाचा मुलगा १९ तासानी ढिगार्‍यातून सुखरूप जिवंत बाहेर काढले.

जेसीबी आणि पोकलेनच्या साह्याने ढिगारे उपसण्याचे काम सुरू आहे. या कामात व्हाईट आर्मीचे जवान मार्गदर्शन देत आहेत. एखादा मृतदेह किंवा जिवंत व्यक्ती सुखरूपपणे बाहेर काढण्याचा अनुभव असलेल्या व्हाईट आर्मीचे स्पेशल टास्क फोर्स काम करत आहे. सोबत एनडीआरएफचे जवान आहेत स्थानिक प्रशासनचे वेगवेगळे मदत करणारे स्वयंसेवी संस्था आहेत.

व्हाईट आर्मीच्या वतीने पूर्णपणे नियोजनबद्ध बचावकार्य सुरू करण्यात आलेले आहे. अजून ढिगाऱ्याखाली चार ते पाच लोक अडकलेले आहेत, ते कशा अवस्थेत आहेत हे ढिगारे उपसल्यावर समजणार आहे. हे काम आज रात्रभर चालू असणार आहे. उद्या सकाळपर्यंत हे काम पूर्णपणे संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

स्थानिक प्रशासनाच्या सोबत मदत व बचावकार्यासाठी दुर्घटनेत लोकांच्या मदतीसाठी  सोमवारी रात्रीच महाडमध्ये दाखल झालेले  कोल्हापुरातील व्हाईट आर्मीच्या प्रदीप ऐनापुरे, नितेश वनकोरे, विनायक भाट, सुधीर गोरे, निलेश वनकोरे, प्रेम सातपुते, सुमित साबळे, आकाश निरमळे, नितीन लोहार, विकी निरमळे, ओंकार पाटील, अक्षय पाटील, केतन म्हात्रे, शालम आवळे, सिद्धेश पाटील या जवानांनी  पहाटेपासून बचावकार्य करत आहेत अशी माहिती व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी दिली आहे.

महाडमध्ये जी दुर्घटना झाली, त्या काळजीपुरा परिसरातील तारीख गार्डन येथील पाच मजली इमारतीमध्ये एकूण ४१ प्लेट होत्या, त्या कोसळल्या. त्यातून जवळपास ८० जण सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, तर २० जण बेपत्ता आहेत. दुर्घटनेत लोकांच्या मदतीसाठी येथील ‘व्हाईट आर्मी’चे पथक मदतीला धावून गेले आहे. 

कोल्हापूर असो, महाराष्ट्र असो की देश, कोणतेही नैसर्गिक संकट आले किंवा मोठी दुर्घटना घडली की तिथे व्हाईट आर्मी मानवतेच्या भावनेने धावून गेली आहे. कोल्हापुरात गतवर्षी महापुरात आणि यंदा कोरोना संकटात जीव धोक्यात घालून त्यांचे जवान गेली चार महिने समाजाच्या मदतीला धावून गेले आहेत.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाmahad-acमहाडkolhapurकोल्हापूर