शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सोहाळे बंधाऱ्याची डागडुजी युद्धपातळीवर

By admin | Updated: May 29, 2015 00:07 IST

गळती काढण्याचे काम : राजीव गांधी पाणी वापर संस्थेचा पुढाकार

ज्योतीप्रसाद सावंत- आजरा --लोकवर्गणीअभावी रेंगाळलेल्या सोहाळे बंधाऱ्याची गळती काढण्यासह पाणी अडविण्याचे काम अखेर राजीव गांधी पाणी वापर संस्थेच्या पुढाकाराने मार्गी लागत असून, पुढच्या वर्षी पाणीसाठा पूर्ण क्षमतेने होण्यासाठी बंधाऱ्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.जलसंधारण विभागाच्या अखत्यारित रामतीर्थ परिसरात हिरण्यकेशी नदीवर असणाऱ्या या बंधाऱ्याला गळत्या असल्याने व पाणी अडविण्याकरिता सडलेले लोखंडी बरगे वापरले जात होते. यामुळे सलग चार वर्षे जानेवारी महिन्यात बरग्यांना पाण्याचा दाब न पेलल्याने बरगे निसटून पाणी वाटून जाण्याचा प्रकार घडला. यामुळे या बंधाऱ्यातील पाण्यावर अवलंबून असणारा व उन्हाळी पिके घेणारा शेतकरी वर्ग वारंवार अडचणीत आला आहे.राजीव गांधी पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून सदर बंधारा दुरूस्तीकरिता हालचाली सुरू होत्या; पण शेतकरी वर्गाकडून सुमारे ११ लाख रूपयांची लोकवर्गणी भरली जात नसल्याचे कारण पुढे करून जलसंधारण विभागाने बंधारा दुरूस्तीची वर्क आॅर्डर रद्दचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला होता. सोहाळे, बाची, सोहाळेवाडी, साळगाव येथील ५५० शेतकऱ्यांच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. बंधाऱ्याची दुरूस्ती सुरू झाल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.शेतकरी वर्गाने लोकवर्गणी भरण्यास हिरवा कंदील दाखविल्याने बंधाऱ्याचे काम सुरू झाले आहे. बंधाऱ्याची गळती काढणे, पाणी अडविण्याकरिता नवीन बरगे वापरणे, इत्यादी कामे हाती घेण्यात आली आहेत. शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचे नियोजन सुरू आहे.बंधाऱ्यात पाणी नाहीसोहाळे बंधाऱ्यात पाणी साठविले गेल्याने याच नदीवर असणाऱ्या साळगाव व देवर्डे बंधाऱ्यात पुरेसे पाणी साठत असते. सोहाळे बंधाऱ्याला गळती लागल्याने साळगाव व देवर्डे हे दोन्ही बंधारे पाण्याअभावी उघडे दिसत आहेत.रामतीर्थ धबधबा बंदयावर्षी सोहाळे बंधाऱ्यात काहीच पाणी नसल्याने रामतीर्थ धबधबाही पूर्णपणे बंद झाला आहे.