शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

सातारा, सांगलीतील मदत निधी..,‘कोल्हापूर’ला कधी; मे महिन्यापासून प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 12:58 IST

जिल्ह्यातील ४६ हजार शेतकऱ्यांचे १७.७३ कोटींचे नुकसान 

कोल्हापूर : राज्य शासनाने नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८९ कोटी मदत निधीस मान्यता दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ४६ हजार शेतकऱ्यांचे मे व ऑगस्टमधील अतिवृष्टीने १७.७३ कोटींचे नुकसान झाले आहे. त्या निधीला शासन मान्यता कधी देणार? याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.यंदा राज्यात सगळीकडेच पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १७ मेपासून पाऊस सुरू आहे. मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १० हजार २८४ शेतकऱ्यांचे ३ कोटी ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून शासनाला अहवाल सादर केला आहे. तोपर्यंत ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने ३६ हजार ५५९ शेतकऱ्यांचे ८८३५ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. यामध्ये १४ काेटी २८ लाखांचे नुकसान झाले आहे. दोन्ही पंचनामे करून शासनाला निधीसाठी पाठवले आहेत.राज्य शासनाने जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्यासाठी ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले. मात्र, कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? याकडे लक्ष लागले आहे.

अशी दिली शासनाने मान्यता..जिल्हा - बाधित शेतकरी - क्षेत्र हेक्टर  -मंजूर निधी

  • नांदेड - ७.७४ लाख - ६.४८ लाख - ५५३.४८ कोटी
  • परभणी - २.३८ लाख - १.५१ लाख - १२८.३८ कोटी
  • सातारा - १४२- २१.६० - ३.२३ लाख
  • सांगली - १३,४७५ - ४,०७४ - ७.४५ कोटी

            मदत कर्जाला घेता येणार नाहीनैसर्गिक आपत्तीमध्ये दिलेल्या मदतीचा निधी शेतकऱ्यांच्या कर्ज अथवा अन्य वसुलीत वळती करू नयेत, यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरून बँकांना निर्देश द्यावेत, अशा स्पष्ट सूचनाही मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी दिल्या आहेत.