शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

सातारा, सांगलीतील मदत निधी..,‘कोल्हापूर’ला कधी; मे महिन्यापासून प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 12:58 IST

जिल्ह्यातील ४६ हजार शेतकऱ्यांचे १७.७३ कोटींचे नुकसान 

कोल्हापूर : राज्य शासनाने नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८९ कोटी मदत निधीस मान्यता दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ४६ हजार शेतकऱ्यांचे मे व ऑगस्टमधील अतिवृष्टीने १७.७३ कोटींचे नुकसान झाले आहे. त्या निधीला शासन मान्यता कधी देणार? याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.यंदा राज्यात सगळीकडेच पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १७ मेपासून पाऊस सुरू आहे. मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १० हजार २८४ शेतकऱ्यांचे ३ कोटी ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून शासनाला अहवाल सादर केला आहे. तोपर्यंत ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने ३६ हजार ५५९ शेतकऱ्यांचे ८८३५ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. यामध्ये १४ काेटी २८ लाखांचे नुकसान झाले आहे. दोन्ही पंचनामे करून शासनाला निधीसाठी पाठवले आहेत.राज्य शासनाने जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्यासाठी ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले. मात्र, कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? याकडे लक्ष लागले आहे.

अशी दिली शासनाने मान्यता..जिल्हा - बाधित शेतकरी - क्षेत्र हेक्टर  -मंजूर निधी

  • नांदेड - ७.७४ लाख - ६.४८ लाख - ५५३.४८ कोटी
  • परभणी - २.३८ लाख - १.५१ लाख - १२८.३८ कोटी
  • सातारा - १४२- २१.६० - ३.२३ लाख
  • सांगली - १३,४७५ - ४,०७४ - ७.४५ कोटी

            मदत कर्जाला घेता येणार नाहीनैसर्गिक आपत्तीमध्ये दिलेल्या मदतीचा निधी शेतकऱ्यांच्या कर्ज अथवा अन्य वसुलीत वळती करू नयेत, यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरून बँकांना निर्देश द्यावेत, अशा स्पष्ट सूचनाही मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी दिल्या आहेत.