शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवस शहरास अपुरा पाणीपुरवठा

By admin | Updated: May 13, 2015 00:48 IST

पाणी जपून वापरण्याचे आवाहन : बालिंगा उपसा केंद्रातील पंप बदलण्याचे काम सुरू

कोल्हापूर : बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातील पाणी उपसा करणारी यंत्रणा बदलण्याचे काम महापालिकेने मंगळवारपासून हाती घेतले आहे. हे काम पूर्ण होण्यास १५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने शहरातील ए, बी, सी, डी वॉर्ड व त्यास संलग्नित ग्रामीण भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन शहर पाणीपुरवठा विभागाने पत्रकाद्वारे केले आहे.बालिंगा येथील उपसा केंद्रातील यंत्रणेत वारंवार बिघाड होत आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणेचे नूतनीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एक-एक करीत सर्व यंत्रणा बदलण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ए, बी, सी, डी वॉर्डांतील अनेक भागांत अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. मंगळवारपासून यंत्रणा बदलण्याच्या कामास सुरुवात झाली. हे काम पूर्ण होण्यास किमान १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. या नूतनीकरण कामाचा आपटेनगर परिसर, सानेगुरुजी वसाहत, रिंग रोड संलग्नित परिसर, रायगड कॉलनी, शिवाजी पेठ व मंगळवार पेठ परिसर, देवकर पाणंद, रंकाळा व गंगावेश परिसर, पापाची तिकटी, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर, बिंदू चौक व लक्ष्मीपुरी परिसर, फुलेवाडी व लक्षतीर्थ वसाहत, आदींसह ए, बी, सी व डी वॉर्डांसह ई वॉर्डातील शाहूपुरीच्या काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. शहरवासीयांसाठी दररोज महापालिका शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रांतून १२० दशलक्ष लिटर्स पाण्याचा उपसा करते. बालिंगा उपसा केंद्रात काम सुरू असले तरी इतर दोन केंद्रांतून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा केला जाणार आहे. नागरिकांना पाणी कमी पडू नये, याची खबरदारी घेतल्याचे प्रशासनाने पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)सर्व यंत्रणेचे नूतनीकरणए, बी, सी, डी वॉर्ड व त्यास संलग्नित ग्रामीण भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार बालिंगा येथील उपसा केंद्रातील यंत्रणेत वारंवार बिघाड होत आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणेचे नूतनीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हे काम पूर्ण होण्यास किमान १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे.