शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनातील विषय ....पंधराशेपैकी २६ चालकांकडून अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST

कोल्हापूर : चालकांनी एस.टी.मधील प्रवासी म्हणजे आपले कुटुंब समजून बसवाहतूक केल्यामुळे केवळ २६ अपघात झाले आहेत. याचाच अर्थ १५०१ ...

कोल्हापूर : चालकांनी एस.टी.मधील प्रवासी म्हणजे आपले कुटुंब समजून बसवाहतूक केल्यामुळे केवळ २६ अपघात झाले आहेत. याचाच अर्थ १५०१ चालकांपैकी २६ जणांकडून नकळत चुका झाल्या किंवा समोरून आलेल्या वाहनाने ठोकर दिल्याने अपघात झाले आहेत.

कोल्हापूर विभागाच्या कागल, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, गारगोटी, आजरा, हातकणंगले, जयसिंगपूर, राधानगरी, आदी आगारांमध्ये एकूण १५०१ चालक आहेत. गेल्या वर्षभरात या चालकांपैकी जानेवारी ते डिसेंबर २०२० अखेर २६ चालकांकडून अपघात झाले. राज्यातील इतर आगारांच्या तुलनेत ही संख्या नगण्यच आहे. चालकांचे मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी अधिकारीवर्ग सातत्याने प्रबोधन करत असतो. शारीरिकदृष्ट्या चालकांवर ताण येणार नाही, याची काळजी घेतली जाते. वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते. त्यामुळेच वर्षभरात एकूण ७८ जणांचा विना अपघात बस चालविली म्हणून सत्कार झाला. बसेसची गती ६५ ते ७० प्रति तास इतकीच मर्यादित केली आहे. त्यामुळे महामार्ग असो अथवा घाटमार्ग त्यात चालक डोळ्यांत तेल घालून व एस. टी. बसमधील प्रवासी आपलेच कुटुंब समजून वाहन चालवितात. त्यामुळे या विभागातून अपघातांचे प्रमाण कमी आहे.

६० ते ६५ ला लाॅक तरीही अपघात

महामंडळाच्या बसेसच्या क्षमतेप्रमाणे ६० ते ६५ प्रतितास किलोमीटर वेगाला लाॅक केले आहे तरीही चालकांच्या अतिआत्मविश्वासामुळे काहीवेळा अपघात होतात. दुचाकीस्वारांच्या अचानक समोर येण्यामुळे व त्यांना चुकविताना चालकांकडून अपघात झाले आहेत. यात समोरच्या वाहनधारकाला चुकविताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाला ठोकर बसते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

पाॅईंटर

- जिल्ह्यातील एस. टी. चालकांची संख्या - १५०१

विना अपघात सत्कार

२५ वर्षे सेवा झालेले - ०३

२० वर्षे सेवा झालेले - १४

१५ वर्षे सेवा झालेले -०८

१० वर्षे सेवा झालेले - ३९

५ वर्षे सेवा झालेले - १४

वर्षभरात झालेले अपघात असे,

जानेवारी २०२०- ०९

फेब्रुवारी - ०५

मार्च -०५

एप्रिल-०५

मे-०

जून ०१

जुलै-०

ऑगस्ट-०

सप्टेंबर-०१

ऑक्टोबर -०२

नोव्हेंबर-०२

डिसेंबर -०१

चालकांची मानसिक स्थिती चांगली राहण्यासाठी त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते. प्रत्येक चालकाची वाहतूक नियमांबद्दलचे प्रबोधन, जनजागृती केली जाते. सातत्याने वेळ आणि गतीबद्दल लेखी विचारणा चालकांना केली जाते. त्यामुळे अपघात रोखण्यास यश आले आहे.

- शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी, कोल्हापूर विभाग

कोट

प्रवासी वाहतूक करतो, याचे भान सातत्याने मनात ठेवले तर अपघात होत नाहीत. त्यामुळेच तीस वर्षे विना अपघात सेवा बजावू शकलो.

- बिरसिद्धा कट्टीकर, चालक, गडहिंग्लज आगार

कोट

सुरक्षित अंतर ठेवूनच प्रवासी वाहतूक करतो. विशेषत: अतिआत्मविश्वास अंगी बाळगत नाही त्यामुळेच २५ वर्षांपेक्षा अधिक काळ विना अपघात सेवा बजावली.

- विजय शेलार, चालक, कोल्हापूर आगार