शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका
2
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
5
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
6
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
7
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
8
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
9
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
10
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
11
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
12
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
13
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
14
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
15
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
16
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
17
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
18
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
19
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
20
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...

बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा भाजपचा प्रयत्न जनतेने झिडकारला - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 12:24 IST

आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलेले नाही, सोडणार नाही.. तुम्ही काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीसोबत सरकारमध्ये गेला त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे गेले होते?

कोल्हापूर : विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघात भाजपने काँग्रेसला छुपी मदत केली होती. तशी छुपी युती आम्ही करत नाही. शिवसेना समोरून वार करते, पाठीत वार करणारी आमची औलाद नाही. हिंदुत्वाचे पेटंट एकट्या भाजपनेच घेतले आहे का, अशी रोखठोक विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. भाजपने नकली भगव्याचा बुरखा पांघरला असून, तो या निवडणुकीत फाटल्याशिवाय राहणार नाही, असेही ठाकरे यांनी बजावले.कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संबोधित केले.मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलेले नाही, सोडणार नाही.. तुम्ही काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीसोबत सरकारमध्ये गेला त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे गेले होते? भाजपने देशात बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र जनतेने तो झिडकारून लावला. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल भाजपला एवढेच प्रेम होते तर त्यांच्या खोलीत दिलेला शब्द अमित शहा यांनी का पाळला नाही. भाजपला अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांनीच भगवी दिशा दाखवली; परंतु त्यांचा आता भाजपला विसर पडला आहे.ग्रामपंचायतपासूनच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा फोटो पाहतो, ते पंतप्रधान आहेत की सरपंच हेच कळत नाही. काल देेवेंद्र फडणवीस कोल्हापूरला येऊन गेले, विकासावर बोलण्यासारखे काहीच नसल्याने त्यांनी धार्मिक मुद्द्यावर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्वाचे पेटंट केवळ भाजपने घेतले आहे का? आतापर्यंत जनसंघ, जनता पक्ष मग भाजप असे किती रंग बदलले. शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला भगवी दिशा दाखवली याचा विसर पडला आहे. सीमा भागातील मराठी माणसावर अत्याचार होत असताना तुमची तोंडे का बंद होती? तेथील शिवरायांचा भगवा उतरवला, त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे गेले होते..?

कोल्हापूर बालेकिल्ला..कोल्हापूर भगव्याचा बालेकिल्ला आजही आहे आणि उद्याही राहील. मर्दासारखे कसे लढावे, हे कोल्हापूरकरांकडून शिकावे. कोल्हापूर हिंदुत्वाचा ठसा पुसू देणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.

भाजप खोटे बोलण्यात पटाईत

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार उत्तम चाललेले आहे, जनतेच्या विकासाचे अनेक निर्णय आम्ही घेत आहोत, फक्त आम्ही खोटे बोलत नाही, येथेच कमी पडत आहोत. कमी पडलो तरी चालेल; पण खोटे बोलणार नाही. खोटे बोल, पण रेटून बोल ही भाजपची सवय आहे.

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkolhapurकोल्हापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv Senaशिवसेना