शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा भाजपचा प्रयत्न जनतेने झिडकारला - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 12:24 IST

आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलेले नाही, सोडणार नाही.. तुम्ही काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीसोबत सरकारमध्ये गेला त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे गेले होते?

कोल्हापूर : विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघात भाजपने काँग्रेसला छुपी मदत केली होती. तशी छुपी युती आम्ही करत नाही. शिवसेना समोरून वार करते, पाठीत वार करणारी आमची औलाद नाही. हिंदुत्वाचे पेटंट एकट्या भाजपनेच घेतले आहे का, अशी रोखठोक विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. भाजपने नकली भगव्याचा बुरखा पांघरला असून, तो या निवडणुकीत फाटल्याशिवाय राहणार नाही, असेही ठाकरे यांनी बजावले.कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संबोधित केले.मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलेले नाही, सोडणार नाही.. तुम्ही काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीसोबत सरकारमध्ये गेला त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे गेले होते? भाजपने देशात बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र जनतेने तो झिडकारून लावला. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल भाजपला एवढेच प्रेम होते तर त्यांच्या खोलीत दिलेला शब्द अमित शहा यांनी का पाळला नाही. भाजपला अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांनीच भगवी दिशा दाखवली; परंतु त्यांचा आता भाजपला विसर पडला आहे.ग्रामपंचायतपासूनच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा फोटो पाहतो, ते पंतप्रधान आहेत की सरपंच हेच कळत नाही. काल देेवेंद्र फडणवीस कोल्हापूरला येऊन गेले, विकासावर बोलण्यासारखे काहीच नसल्याने त्यांनी धार्मिक मुद्द्यावर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्वाचे पेटंट केवळ भाजपने घेतले आहे का? आतापर्यंत जनसंघ, जनता पक्ष मग भाजप असे किती रंग बदलले. शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला भगवी दिशा दाखवली याचा विसर पडला आहे. सीमा भागातील मराठी माणसावर अत्याचार होत असताना तुमची तोंडे का बंद होती? तेथील शिवरायांचा भगवा उतरवला, त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे गेले होते..?

कोल्हापूर बालेकिल्ला..कोल्हापूर भगव्याचा बालेकिल्ला आजही आहे आणि उद्याही राहील. मर्दासारखे कसे लढावे, हे कोल्हापूरकरांकडून शिकावे. कोल्हापूर हिंदुत्वाचा ठसा पुसू देणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.

भाजप खोटे बोलण्यात पटाईत

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार उत्तम चाललेले आहे, जनतेच्या विकासाचे अनेक निर्णय आम्ही घेत आहोत, फक्त आम्ही खोटे बोलत नाही, येथेच कमी पडत आहोत. कमी पडलो तरी चालेल; पण खोटे बोलणार नाही. खोटे बोल, पण रेटून बोल ही भाजपची सवय आहे.

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkolhapurकोल्हापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv Senaशिवसेना