शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराचे मानधन थकले

By admin | Updated: October 19, 2014 00:41 IST

सहा महिन्यांपासून बचत गट वंचित : तब्बल २० कोटी अनुदान लटकणार बँक खात्यांअभावी

राम मगदूम ल्ल गडहिंग्लजमाध्यान्ह भोजन योजनेंतर्गत शालेय पोषण आहार शिजवून वाढण्याचा ठेका घेतलेल्या बचत गटांचे मानधन गेल्या सहा महिन्यांपासून थकीत आहे. अनुदानाची सुमारे २० कोटींची रक्कम या योजनेसाठी बँकेत स्वतंत्र खातीच न काढल्यामुळे थकीत रक्कम आणखी काही काळ लटकण्याची भीती व्यक्त होत आहे.नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात धान्य खरेदीसह आहार शिजविण्यासाठी पैसे दिले जातात, तर ग्रामीण शाळांना पोषण आहाराचे धान्य शासनातर्फे पुरविले जाते. ठेकेदार बचत गटाला भाजीपाला व इंधनासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे १ ली ते ५ वी साठी १ रुपये २१ पैसे, तर ६ वी ते ८ वी साठी १ रुपये ५१ पैसे इतकी रक्कम मिळते. यापूर्वी धान्य जमा-खर्च नोंदीसह लिखापडीची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवरच होती; मात्र मुख्याध्यापकांनी ही जबाबदारी नाकारली. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती सचिव म्हणून या योजनेच्या नियंत्रकाची भूमिका मुख्याध्यापकांकडेच कायम ठेवण्यात आली आहे. पोषण आहार अनुदानाचे आर्थिक व्यवहार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सचिव यांच्या संयुक्त स्वाक्षरीने करण्याचे निर्देश असून, त्यासाठी ‘आरटीजीएस’ सुविधा असणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढण्याचे बंधन आहे. बेअरर चेकने व्यवहार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. एप्रिल २०१२ पासून दरवर्षी मुख्याध्यापकांकडून आॅनलाईन माहिती मागविण्यात येते. त्यामध्ये पोषण आहारासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत स्वतंत्र खाती असल्याची माहिती बहुतांश मुख्याध्यापकांनी नोंदविली आहे. मात्र, अशा प्रकारची खाती प्रत्यक्षात नसल्यामुळे या योजनेच्या अनुदानाच्या विनियोगाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळेत बँकेत खाते न उघडल्यामुळे अनुदान अदा करण्यास विलंब झाल्यास मुख्याध्यापकांनाच सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल, असे पत्र गडहिंग्लजच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठविले आहे.माध्यान्ह भोजन योजनेसाठी राष्ट्रीयीकृत बँकेत स्वतंत्र खाती उघडण्यासंदर्भात संबंधित मुख्याध्यापकांना सूचना दिल्या असून, अनुदान वेळेत प्राप्त होण्याबरोबरच योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येण्यास मदत होईल.- डॉ. जी. बी. कमळकर गटशिक्षणाधिकारी, गडहिंग्लजबचत गटांना थेट अनुदान द्याशालेय पोषण आहाराची जबाबदारी बचत गटांकडे सोपविण्यात आली आहे. धान्य खरेदीसह शिजविण्याची व हिशेबाच्या नोंदी ठेवण्याचे कामदेखील संबंधित ठेकेदाराकडेच आहे. बचत गटांना हे अनुदान थेटपणे दिल्यास ते वेळेत मिळेल आणि आहाराच्या दर्जाचा प्रश्नही निर्माण होणार नाही. - के.बी. पोवार, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघ