शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

नवनिर्वाचित सदस्य नेत्यांच्या नजरकैदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:22 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित सदस्यांना देवदर्शनासह अलिशान हॉटेलवर ...

राजाराम लोंढे,

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित सदस्यांना देवदर्शनासह अलिशान हॉटेलवर बडदास्त केली जात आहे. सरपंच आरक्षणानंतर फोडाफाेडीचे राजकारण उफाळून आले असून सदस्य फोडण्यासाठी साम, दाम, दंड सर्व नितीचा वापर सुरू आहे. त्यामुळे निवडीपर्यंत सदस्यांची मर्जी सांभाळताना स्थानिक नेत्यांची दमछाक उडाली आहे.

जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होऊन तिथे नवनिर्वाचित सदस्यांची निवड झाली आहे. या सदस्यांमधून मंगळवारी (दि. ९) सरपंच व उपसरपंच निवडी होणार आहेत. बहुतांशी गावात काठावरचे बहुमत असल्याने निवडणूक झाल्यापासून सदस्य फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे सदस्यांना सांभाळताना स्थानिक नेत्यांना कसरत करावी लागत आहे. सरपंच आरक्षणानंतर तर गावातील राजकारणाने चांगलीच उसळी घेतली आहे. सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या दोन्ही गटाकडून साम, दाम, दंड या नितीचा सर्रास वापर केला जात आहे. राजकीय दबाव टाकून फोडाफोडी केली जात आहे. स्थानिक पातळीवरील सदस्यांचे कच्चे दुवे शोधून त्याचाही वापर त्यांचे मन वळवण्यासाठी सुरू आहेत.

या सगळ्या वातावरणापासून सदस्यांना दूर ठेवण्यासाठी स्थानिक नेत्यांनी त्यांना आपल्या नजरकैदेत ठेवले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सदस्य सहलीसाठी बाहेर पडले आहेत. गोवा, रत्नागिरी, महाबळेश्वर, शिर्डी येथे सदस्यांना हलवले आहे. त्यांचा विरोधी गटाशी संपर्क होऊ नये, यासाठी एक यंत्रणा गाडीत ठेवली आहे. त्यांना काय हवे, काय नको, हे सगळ्याची पूर्तता केली जाते. सोमवारी रात्री कोल्हापूरात आणून मंगळवारी सरपंच निवडी दिवशी थेट ग्रामपंचायत सभागृहातच सदस्यांना आणण्याचे नियोजन अनेक गावात आहेत.

आमदार, खासदारांचाही हस्तक्षेप

ग्रामपंचायतीच्या निवडणूक स्थानिक गटातटातच झाल्या. लोकसभा, विधानसभेला एकत्र असणारे गट एकमेकांसमोर उभा टाकले. बहुमताचा आकडा गाठताना पुन्हा गटतट एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातून थेट आमदार, खासदारांचाही हस्तक्षेप सुरू झाल्याने अनेक गावात पेच निर्माण झाला आहे.

जेवणावळी, प्रलोभने आणि आणाभाका

निकाल लागल्यापासून सदस्यांना खूष ठेवण्यासाठी रोज जेवणावळी सुरू आहेत. रात्री धाब्यावरचे चमचमीत जेवणाबरोबरच इतरही प्रलोभने दिली जात आहेत. त्यातूनही कोणी फुटू नये, यासाठी आणाभाकाही घेतल्या जात आहेत. ग्रामदैवतांचा भंडारा, गुलाल उचलून शपथीही अनेक ठिकाणी घेतल्या आहेत.