शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात चिकन, अंड्यांच्या दराचा नवा फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: पोल्ट्रीधारक आणि ग्राहकांच लूट थांबविण्यासाठी आता पशुसंवर्धन विभागाने पुढे येत चिकन, अंड्याच्या खरेदी-विक्री दराचा नवा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर: पोल्ट्रीधारक आणि ग्राहकांच लूट थांबविण्यासाठी आता पशुसंवर्धन विभागाने पुढे येत चिकन, अंड्याच्या खरेदी-विक्री दराचा नवा फॉर्म्युला निश्चित करण्याचे ठरवले आहे. येत्या काही दिवसांत विक्रेते व पोल्ट्रीधारकांची एकत्रित बैठकही होणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त वाय. ए. पठाण यांनी दिली.

बर्ड फ्लूच्या भीतीने कोल्हापुरात चिकन, अंड्याचे दर कोसळले आहेत. पोल्ट्रीधारकांकडून खरेदी केले जाणारे दर कमी झाले आहेत, पण ग्राहकांना मात्र चढ्याच भावाने खरेदी करावे लागत आहे. पोल्ट्रीधारकांचे प्रचंड नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापुरात अंडी उबवणी केंद्रात पोल्ट्रीधारक व पशुसंवर्धन विभागाची विशेष कार्यशाळा झाली. त्यात चिकन, अंडी खाण्याविषयीचे गैरसमज दूर करण्याबरोबरच पोल्ट्रीधारकांचे प्रश्न साेडविण्यासाठी दर निश्चितीचा नवा पर्याय पुढे आला.

याविषयी बोलताना पशुसंवर्धन उपायुक्त वाय. ए. पठाण यांनी जिल्ह्यात बर्ड फ्लू अजिबात नाही, पण चिकन विक्रेत्यांकडून दर पाडून जिवंत पक्षी खरेदी केले जात आहेत. ग्राहकांना मात्र चढ्या दरानेच विकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच हा दर निश्चित करण्याचे नियोजन सुरू केल्याचे सांगितले. यासाठी जिल्ह्यातील सर्व पोल्ट्रीधारक, चिकन विक्रेते यांची एकत्रित बैठक घेऊन किरकोळ व घाऊक विक्रीचे दर काय असावेत हे ठरवले जाणार आहे. ग्राहकालाही रास्त किमतीत चिकन, अंडी मिळावीत व पोल्ट्रीचा व्यवसाय करणाऱ्यांनाही चार पैसे राहावते, दलाली कमी व्हावी हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे पठाण यांनी स्पष्ट केले.

बैठकीत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, डॉ. सुरेश भरते, डॉ. ए. एस.नाईक, डॉ. सॅम रॉड्रीक यांनीही मार्गदर्शन केले. बर्ड फ्लूची भीती अजिबात बाळगू नका, असे आवाहनही या सर्वांनी केले.

चौकट ०१

बर्ड फ्लूच्या धास्तीने अडीच किलोच्या एका कोंबडीचा दर ४० रुपये झाला आहे. ७५ रुपयांचे खाद्य घालून ४० दिवस तिची जोपासना करून ४० रुपयेच हातात पडत असल्याने पोल्ट्रीधारकांचे रोज लाखोंचे नुकसान होत आहे याकडे लक्ष वेधले. जिवंत पक्षी खरेदी करण्याचा आणि प्रत्यक्ष चिकन अंडी विकण्यातील दरातील तफावतच पोल्ट्रीधारकांच्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे. साधारणपणे दुप्पट नफा गृहीत धरून दर असणे गरजेचे असताना पोल्ट्रीधारकांपेक्षा चार ते पाच पट नफा विक्रेते कमावत असल्याचे दिसत आहे.