शहरं
Join us  
Trending Stories
1
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
2
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
3
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
4
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
5
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
6
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
7
Top Marathi News Live: नितीश कुमारांचा मुलगा बनला मंत्री, निशांत कुमार यांनी घेतली शपथ
8
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
9
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
10
Video - हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा
11
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
12
Mangala Thoke : शिकण्याची जिद्द! दिवसा घरकाम, रात्री अभ्यास; ६८ वर्षांच्या आजींनी ६०% गुणांसह पास केली बारावी
13
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
14
अमेरिकेत विमानाला अपघात, लँडिंग करताना हायवेवरील ट्रकला धडकलं आणि...; व्हिडीओ व्हायरल!
15
Samudrik Shastra: चेहरा बघून ओळखा स्वभाव! गोल, चौकोनी की अंडाकृती? काय सांगतो तुमचा 'फेस शेप'?
16
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
17
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
18
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
19
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
20
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शेतीची नवे विधेयके शेतकऱ्यांना उद‌्ध्वस्त करणारी : डॉ. गणेश देवी यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 18:31 IST

पंतप्रधान मोदी यांच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणामुळे देशाची तिजोरी तिरडीवर पोहोचली आहे, अशी टीका राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी गुरुवारी येथे केली. सुधारित तीन शेती विधेयके शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारी आहेत. त्यांना विरोध करण्यासाठी पक्ष, गट-तट विसरून रस्त्यावर उतरा; नाही तर पुढील ५० वर्षे परिणाम भोगा, असा इशाराही त्यांनी दिला.

ठळक मुद्देशेतीची नवे विधेयके शेतकऱ्यांना उद‌्ध्वस्त करणारीडॉ.गणेश देवी यांचा इशारा : गटतट विसरून रस्त्यावर उतरा

कोल्हापूर : पंतप्रधान मोदी यांच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणामुळे देशाची तिजोरी तिरडीवर पोहोचली आहे, अशी टीका राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी गुरुवारी येथे केली. सुधारित तीन शेती विधेयके शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारी आहेत. त्यांना विरोध करण्यासाठी पक्ष, गट-तट विसरून रस्त्यावर उतरा; नाही तर पुढील ५० वर्षे परिणाम भोगा, असा इशाराही त्यांनी दिला.

पंतप्रधान मोदी यांनी बहुमताच्या जोरावर संसदेत शेतीची तीन सुधारित विधेयके मंजूर करून घेतली आहेत. याला देशभरातील शेतकरी तीव्र विरोध करीत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रसेवा दलाच्या सोशल फोरमअंतर्गत जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. शेतकरी व संबंधित घटकामध्ये या विधेयकाविषयी वस्तुस्थिती मांडावी म्हणून गणेश देवी हे गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत.

कोल्हापुरात आल्यानंतर गुरुवारी सकाळी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांची भेट घेऊन ते बाजार समितीत आयोजित अडते, व्यापारी, शेतकरी यांच्या बैठकीला आले. त्यांच्याशी संवाद साधताना नवीन कायदे आणि त्यांचे बाजार समितीच्या घटकांवर होणारे परिणाम यांचे विस्तृत विवेचन करून गाफील राहू नका. तीव्र लढ्यासाठी सज्ज राहा असे त्यांनी आवाहन केले. प्रा. जालंधर पाटील यांनी प्रास्ताविक केले. धनाजी गुरव, सूर्यकांत पाटील यांनी मनोगत मांडले. मोहन सालपे यांनी आभार मानले.
 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र