शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘पदवीधर’मध्ये मुश्रीफ यांच्या जोडण्या ठरल्या सरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी एकतर्फी विजयी मिळवून ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी एकतर्फी विजयी मिळवून भाजपच्या बालेकिल्ल्याला जोरदार हादरा दिला. या मतदारसंघात लाड व भाजपचे संग्राम देशमुख यांच्यात लढत नव्हतीच, खरी लढत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात राहिली. काेल्हापूर जिल्ह्यात लाड यांच्यासाठी मुश्रीफ यांनी लावलेल्या जोडण्या सरस ठरल्याचे निकालावरून स्पष्ट होते.

पुणे पदवीधरसाठी सर्वाधिक ८९ हजार ५२९ मतदारांची नोंदणी कोल्हापूर जिल्ह्यात झाली होती. भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला, त्यांच्याकडूनच सर्वाधिक नोंदणी झाल्याने येथे भाजपचा उमेदवार मुसंडी मारेल, असेच वाटत होते. मात्र, महाविकास आघाडीने एकसंधपणे प्रचार यंत्रणा राबविली. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर शिक्षक मतदारसंघाची जबाबदारी असली तरी त्यांच्यासह जिल्ह्यात आघाडीच्या आमदार, माजी आमदारांनी ‘पदवीधर’मध्येही लक्ष दिले होते. विशेष म्हणजे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही निवडणूक हातात घेतली होती. कोल्हापूर जिल्ह्यात अरुण लाड व संग्राम देशमुख असा सामना झालाच नाही, तर मंत्री मुश्रीफ व चंद्रकांत पाटील यांच्यातच लढाई पाहावयास मिळाली. भाजपचा पर्यायाने चंद्रकांत पाटील यांचा बालेकिल्ला ताब्यात घ्यायचाच या ईर्षेने मुश्रीफ यांनी जोडण्या लावल्या होत्या. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्या माध्यमातून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात २० हजार मतदार नोंदणी केली होती. ही सगळे मते लाड यांच्या मागे उभी केलीच, त्याचबरोबर इतर मतदारांकडून पहिल्या पसंतीचे मते घेण्यात ते यशस्वी ठरले. एकूणच लाड यांना मिळालेले मताधिक्य पाहता मंत्री मुश्रीफ यांनी लावलेल्या जोडण्याच सरस ठरल्या, हे निश्चित आहे.

मुश्रीफ यांच्याकडून शिवसैनिकांना स्फुरण

प्रत्येक मेळावा, बैठकांत भाजपचा उमेदवार विजयी झाला तर ती मंडळी आपल्या छाताडावर नाचतील, असे दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ते सातत्याने सांगत होते, तर भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष्य होत असल्याचे सांगत शिवसैनिकांना सतत चेतवत ठेवण्याचे काम मंत्री मुश्रीफ यांनी केले.

देशमुख यांच्या पराभवाची कारणे -

‘पदवीधर’ मतदारसंघात भाजपकडून नवखा उमेदवार

भाजपच्या मतदार नोंदणीवरच संग्राम देशमुखांची भिस्त राहिली.

मतदारांपर्यंत पोहोचण्याचे कमजोर पडलेले नेटवर्क

अरुण लाड यांच्या जमेच्या बाजू-

मागील निवडणुकीतील पराभवाची सहानुभूती

पराभूत होऊन कोल्हापूर जिल्ह्यात ठेवलेला संपर्क

राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेने राबविलेली प्रचार यंत्रणा