शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने कृषिपंपाची वाढवली चारपटीने थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:32 IST

कोल्हापूर : महावितरणने राज्य सरकारकडे सादर केलेल्या अहवालात राज्यातील कृषिपंपाची थकबाकी चारपटीने वाढवून सांगितल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. महावितरण ...

कोल्हापूर : महावितरणने राज्य सरकारकडे सादर केलेल्या अहवालात राज्यातील कृषिपंपाची थकबाकी चारपटीने वाढवून सांगितल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. महावितरण गळती आणि चोरी लपवण्यासाठी शेतकऱ्यांचे नाव पुढे करून बदनामी करत असल्याची भावना बळावली आहे. १२ हजार कोटी असताना ४९ हजार कोटी थकबाकी दाखवण्यात आली आहे. राज्य इरिगेशन फेडरेशनने जोरदार आक्षेप घेतला आहे.

महावितरणने मंगळवारी मुख्यमंत्र्यांसमोर अहवाल सादर करत थकबाकी व कर्जाचे आकडे जाहीर केले. महावितरण कंपनी कृषिपंपाचा वीज वापरच चुकीचा दाखवते, असे वारंवार इरिगेशन फेडरेशनने निदर्शनास आणून दिले आहे. वीज मीटर नसतानाही बिले काढली जातात. वीज पुरवठ्याचे थर्ड पार्टीकडून ऑडिट करावे, अशी मागणी वारंवार करून देखील महावितरणने त्याकडे लक्ष दिलेले नाही. उलट चुकीची थकबाकी दाखवून शेतकरी किती बुडवे आहेत, हे अन्य वीज ग्राहकांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

चौकट

दोन दिवसांची मुदत

कृषिपंपाची खरी थकबाकी किती आहे. त्यात वीज बिल, दंड व दंड व्याजाची रक्कम किती आहे. याची विस्तृत माहिती महावितरणने दोन दिवसांत प्रसिद्ध करावी अन्यथा इरिगेशन फेडरेशनने ही माहीती उघड केले तर महागात पडेल असा इशाराही दिला आहे.

सरकारकडून महावितरणला जास्त अनुदान

कृषिपंपाचा सवलतीचा दर ५ अश्वशक्तीसाठी १ रुपये ५६ पैसे युनिट आहे. आयोगाचा दर ३ रुपये २९ पैसे आहे. यातील फरकाची रक्कम राज्य सरकार महावितरणला देते. आयोगाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम सरकार महावितरणला देते, तरीही महावितरणकडून १ रुपये ५६ पैसे ऐवजी ३ रुपये १२ पैसे प्रतियुनिटचा बाेजा शेतकऱ्यांच्या डोक्यावर मारला जात आहे.

चौकट

प्रतिक्रिया

शेतकऱ्यांना विनाकारण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून बदनामी करू नये. योग्य थकबाकी प्रसिद्ध करावी अन्यथा राज्य इरिगेशन फेडरेशन महावितरणच्या विरोधात रस्त्यावर उतरुन जाब विचारेल.

विक्रांत पाटील, किणीकर, इरिगेशन फेडरेशन जिल्हाध्यक्ष