शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

उदगावात आघाडीत हालचाली, स्वाभिमानीत शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST

शुभम गायकवाड : उदगाव उदगावची निवडणूक मोठ्या चुरशीने झाली. सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये आघाडीच्या आठ तर स्वाभिमानीच्या नऊ जागा निवडून ...

शुभम गायकवाड : उदगाव

उदगावची निवडणूक मोठ्या चुरशीने झाली. सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये आघाडीच्या आठ तर स्वाभिमानीच्या नऊ जागा निवडून आल्या. हीच परिस्थिती कायम राहील, अशी अपेक्षा सर्वांना होती. परंतु, निराशेच्या गर्तेत गेलेल्या आघाडीने आमच्याकडे जिल्हा परिषद, मंत्रिपद, खासदारकी आहे. त्यामुळे आम्हीच गावाचा विकास करू शकतो, हा विश्वास दिला व आश्वासनांची खैरात केल्याने स्वाभिमानीकडून निवडून आलेल्या कलीमुन नदाफ यांनी थेट पत्रकार परिषद घेत आघाडीत प्रवेश केल्याने सारे चित्रच पालटले.

निवडणुकीसाठी स्वाभिमानी विरुद्ध काँग्रेस, शिवसेना, यड्रावकर गट अशी आघाडी आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत आघाडीला आठ तर स्वाभिमानीला आठ असा समसमान कौल मतदारांनी दिला. स्वाभिमानीची एक जागा बिनविरोध झाल्याने त्यांच्या पदरात नऊ जागा पडल्या. काठावरच्या बहुमताने स्वाभिमानी सुरुवातीपासूनच अस्वस्थ होती. त्यातच एका सदस्याने प्रवेश केल्याने बालेकिल्ल्यातच खिंडार पडल्याने आघाडीच्या नेत्यांविरुद्ध माजी सभापती सावकर मादनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील यांच्याकडे त्यांनी तसे म्हणणे मांडल्याचे समजते, तर आघाडीकडून समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, बाळासोा कोळी, राजू मगदूम यांनी स्थानिक निवडणुकीत संदर्भ वेगळे आहेत, आम्हाला आमच्या स्तरावर निर्णय घेऊ द्या, अशी थेट भूमिका नेत्यांजवळ व्यक्त केली आहे. दरम्यान, सरपंच निवडीच्या पार्श्वभूमीवर सदस्य सहलीला गेले आहेत.