शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांचे चुकले... सरकारचे तरी बरोबर आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:20 IST

गडहिंग्लज : प्रकल्प होता २९ कोटींचा; तो २४० कोटींवर गेला. २० वर्षांत धरण झाले नाही. पुनर्वसनासाठी सातत्याने संघर्ष ...

गडहिंग्लज : प्रकल्प होता २९ कोटींचा; तो २४० कोटींवर गेला. २० वर्षांत धरण झाले नाही. पुनर्वसनासाठी सातत्याने संघर्ष सुरू आहे. थोबाडीत मारून घेऊन आत्मक्लेश करणाऱ्या धरणग्रस्तांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले, त्यांचे जरा चुकले. मग सरकारचे तरी बरोबर आहे का? असा सवाल ज्येष्ठ नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी मंगळवारी विचारला.

सोमवारी (दि. ७) आंबेओहोळ प्रकल्पस्थळी आंदोलन करणाऱ्या धरणग्रस्तांविरुद्ध पाटबंधारे अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले आहेत. अधिकाऱ्याला जिवे मारण्याचा व मोबाईलची चोरी हे दोन्ही गुन्हे खोटे आहेत. त्यामुळे ते मागे घ्यावेत, यासाठी आपण प्रांतकचेरीसमोर आज, बुधवारी उपोषणास बसणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

शिंदे म्हणाले, गडहिंग्लज विभागातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी धरणे बांधावीत यासाठी आणि धरणांमुळे विस्थापित होणाऱ्या लोकांचे योग्य पुनर्वसन करावे म्हणूनही आपण लढलो. हक्कासाठी लढण्याचा धरणग्रस्तांना अधिकार आहे. त्यांना गुन्हेगार ठरवू नये.

------------------------------

* उचंगीचे काय झाले?

सन २०१८ मध्ये गडहिंग्लजला झालेल्या पाणी परिषदेत उचंगीचे काम पूर्ण करून त्याचवर्षी जूनमध्ये पाणी अडविण्याची घोषणा तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती; परंतु, ते झाले नाही. त्या धरणाचे कामदेखील आता धरणग्रस्तांनी बंद पाडले आहे. मंत्री हे सरकारचे प्रतिनिधी असतात. त्यांनी खोटे बोलले तर चालते का ? असा प्रश्नही शिंदे यांनी विचारला आहे.

......................................

* ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आंबेओहोळप्रश्नी ११ डिसेंबरला बैठक ठरली आहे. तोपर्यंत काम बंद ठेवावे, असे आपण पाटबंधारे अधिकाऱ्यांना सांगितले होते. तरीदेखील त्यांनी काम सुरू केले; म्हणूनच हा प्रकार घडला. त्याला तेच जबाबदार आहेत, असेही शिंदे म्हणाले.

..............................