शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अस्तरीकरण करूनही पाणी गळती थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:24 IST

बोरवडे : काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम निकृष्ट झाल्याने कालव्यातील पाणी झिरपून शेतात जात असल्याने जमिनी क्षारपड ...

बोरवडे : काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम निकृष्ट झाल्याने कालव्यातील पाणी झिरपून शेतात जात असल्याने जमिनी क्षारपड होत आहेत. अस्तरीकरणातील गळती त्वरित रोखावी, अशी मागणी बोरवडे येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभागास दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेली ३० ते ३५ वर्षे विना प्लास्टर उजव्या कालव्यातून पाणी सोडले जात होते. त्यामुळे जमिनी क्षारपड व नापिक झाल्या. सध्या संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरण झाले असून निकृष्ट कामामुळे पूर्वीप्रमाणे शेतीमध्ये पाणी मिसळत असल्याने जमिनी खराब होत आहेत. अस्तरीकरणामुळे पाण्याची गळती थांबेल असे वाटत होते; पण शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. अस्तरीकरणानंतर एक महिन्याच्या आतच पूर्वीप्रमाणे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी तुंबून शेती खराब होत आहे.

चौकट करणे :

‘काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम दर्जेदार झाले असून शेतकऱ्यांनी हे काम निकृष्ट झाल्याचा केलेला आरोप चुकीचा असून ज्या ठिकाणी जॉईंटमधून पाणी मुरते त्याची दुरुस्ती तत्काळ केली जाईल.’

- अजिंक्य पाटील,

डेप्युटी इंजिनिअर, कोल्हापूर. फोटो ओळी - बोरवडे (ता. कागल) येथील उजव्या कॅनॉलमधून पाणी झिरपत आहे.