शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा क्षेत्राचेही खासगीकरण करण्याचा केंद्राचा डाव, कृष्णा भोयर यांचा आरोप : वीज बिल भरणार नाही भूमिका चुकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:47 IST

कोल्हापूर : केंद्र सरकार ‘विद्युत कायदा २०२०’च्या माध्यमातून देशातील सरकारी मालकीच्या ऊर्जा क्षेत्राचे खासगीकरण करण्याचा खटाटोप करत आहे. मात्र, ...

कोल्हापूर : केंद्र सरकार ‘विद्युत कायदा २०२०’च्या माध्यमातून देशातील सरकारी मालकीच्या ऊर्जा क्षेत्राचे

खासगीकरण करण्याचा खटाटोप करत आहे. मात्र, केंद्राचा हा डाव देशपातळीवरील कामगार संघटना कदापि यशस्वी होऊ देणार नाहीत. प्रसंगी राष्ट्रीय पातळीवरील सात संघटना

एकत्रितपणे कामगारांना सोबत घेऊन बेमुदत संपावर जातील, अशा इशारा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

भोयर म्हणाले, ‘सार्वजनिक क्षेत्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण झाल्यास सामान्य ग्राहकांची

फरपट होईल. सध्या महावितरण कंपन्यांची वीज बिलाची थकबाकी ७१ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. थकबाकी वाढत गेल्यास या कंपन्या तोट्यात दाखवून

खासगीकरण करण्याचा केंद्राचा खटाटोप सुरू आहे. यामुळे वीज बिल भरणार नाही, ही भूमिका अयोग्य आहे. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. खरे तर वीज उद्योग हा जनतेच्या मालकीचा राहिला पाहिजे. सरकारी मालकीच्या वीज कंपन्या या अंबानी, अदानी अशा

भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव आहे. वीज कंपन्यांचे खासगीकरण झाल्यास घरगुती, आदिवासी, पॉवर लूम, आर्थिक दुर्बल घटक व शेतकऱ्यांना सध्या मिळणारी सबसिडी बंद

होईल.

यावेळी वर्कर्स फेडरेशनचे अतिरिक्त सरचिटणीस महेश जोतराव, शकील महात, सागर पाटील, सागर मळगे, सर्जेराव विभुते, आण्णाप्पा कांबळे आदी उपस्थित होते.

सुधारित वीज कायदा राज्यघटनेतील तरतुदींच्या विरुद्ध

भोयर म्हणाले, ‘मुळात सरकारी मालकीच्या महावितरणसह अन्य वीज कंपन्या टिकल्या

पाहिजेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४३ मध्ये देशाचे वीज धोरण निश्चित केले. ऊर्जा क्षेत्र हे सरकारच्या मालकीचे असले पाहिजे हे तेव्हा त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे सुधारित वीज कायदा २०२० हा राज्यघटनेतील तरतुदींच्या विरुद्ध आहे. ऊर्जा क्षेत्राचे खासगीकरण झाल्यास वीज दर ठरविण्याचा राज्य सरकार व विद्युत नियामक आयोगाला अधिकार उरणार

नाही. केंद्र सरकार ‘विद्युत कायदा २०२०’ आणून सगळेच अधिकार स्वत:कडे घेऊ पाहत आहे. ’