शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कळंबीमधील कोळी बांधवांची पुन्हा झाली ताटातूट

By admin | Updated: August 1, 2014 23:28 IST

नियतीचा अन्याय : बारा वर्षांनंतर एकत्र; पंधरा दिवसांपूर्वी भीमराव झाला बेपत्ता

मिरज : लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर विखुरलेल्या कळंबी येथील कोळी कुटुंबातील नरसाप्पा, भीमराव व जयश्री ही मुले सुमारे बारा वर्षांपूर्वी एकत्र आली. कष्टातून जीवन उभारत असताना आता नियतीने पुन्हा त्यांची ताटातूट केली आहे. भीमराव हा गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक बेपत्ता झाला आहे. कोळी बंधंूवरील या आघाताने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. लहानपणी आईचा मृत्यू झाल्याने व वडील बेपत्ता झाल्याने नरसाप्पा, भीमराव व जयश्री ही तीन बालके अनाथ झाली. कालांतराने नरसाप्पा व भीमराव यांच्यापासून त्यांची लहान बहिण जयश्रीची ताटातूट झाली. बहिणीच्या शोधात पुणे व मिरज येथे फिरत असताना कळंबी येथील विलासमती कलगोंडा पाटील यांनी नरसाप्पा व भीमराव यांना घरी नेऊन त्यांचा सांभाळ केला. त्याच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर ‘लोकमत’ने सुमारे बारा वर्षांपूर्वी याबाबत वृत्त प्रसिध्द केले होते. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे नरसाप्पा व भीमराव यांची त्यांच्या बहिणीशी भेट झाली. याबाबतचे वृत्तही ‘लोकमत’च्या तत्कालीन अंकात प्रसिध्द झाले होते. बारा वर्षांपूर्वी एकत्र आलेली भावंडे एकमेकांच्या संपर्कात होती. तिघा भावंडांचा सांभाळ करणाऱ्या विलासमती पाटील यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. आई-वडिलांविना लहानपण गेलेली ही भावंडे आता मोठी झाली आहेत. नरसाप्पा हे सध्या कळंकी येथे सायकल व गाड्यांचे पंक्चर काढण्याचे काम करतात. तर छोटा भाऊ भीमराव हा नुकताच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्यांची बहीण जयश्री ही पुणे येथे नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करुन एका रुग्णालयात नोकरीस असल्याचे नरसाप्पा यांनी सांगिले. नरसाप्पा यांना शासनाच्या घरकुल योजनेतून घर मंजूर झाले आहे. शासनाकडून मिळालेला निधी व कष्टातून जमविलेल्या पैशातून ते कळंबी येथे घराची उभारणी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा विवाह झाला आहे. कोळी बंधूंच्या जीवनात आता सुखाचे दिवस येत असतानाच नियतीने पुन्हा एकदा या कुटुंबावर अन्याय केला आहे. तिघा भावंडांपैकी भीमराव हा १४ जुलैच्या रात्रीपासून अचानक बेपत्ता झाला आहे. चार दिवस शोधाशोध करून व वाट पाहून नरसाप्पा यांनी भीमराव बेपत्ता झाल्याची फिर्याद मिरज ग्रामीण पोलिसांत दिली आहे. कळंबीतील सामाजिक कार्यकर्ते कबीर मुजावर यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून याबाबत हकीकत सांगितली. कोळी बंधूवर झालेल्या या आघातामुळे ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)