शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘राजीव गांधी आरोग्य’मध्ये कोल्हापूर चौथ्या स्थानी

By admin | Updated: November 27, 2015 01:04 IST

जिल्ह्यात ३० हजार रुग्णांना लाभ : राज्य सरकारने ८६ कोटी ४५ लाख खर्च केले

गणेश शिंदे -- कोल्हापूर -सर्वसामान्यांना आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने दोन वर्षांपूर्वी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने सुरू केलेल्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य’ योजनेत राज्यात कोल्हापूर जिल्हा चौथ्या क्रमांकावर असल्याचे आशादायक चित्र आहे. जिल्ह्यात दोन वर्षांत सुमारे ३० हजार ३२८ जणांनी याचा लाभ घेतला, तर सुमारे ८६ कोटी ४५ लाख रुपये राज्य सरकारने यावर खर्च केला आहे. या योजनेत न बसलेल्या दुर्धर आजारांवरील उपचारांकरिता येणाऱ्या खर्चासाठी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी’ हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत रुग्णांना एक लाखापासून ते दोन लाखांपर्यंत मदत मिळणार आहे. या योजनेमुळे सर्वसामान्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत ९७१ आजारांचा समावेश आहे. दीड लाख रुपयांपर्यंतचा लाभ सर्वसामान्यांना या योजनेतून मिळतो. दोन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्णात सुमारे ३० हजार ३२८ जणांनी लाभ घेतला, तर ८६ कोटी रुपये यावर खर्च केला. योजनेतील समाविष्ट रुग्णालयांना राज्य सरकारकडून ‘नॅशनल इन्श्युरन्स कॉर्पोरेशन’या विमा कंपनीकडून परतावा (रिटर्न) दिला जातो. जिल्ह्णात सध्या ३२ रुग्णालये या योजनेत समाविष्ट आहेत.दरम्यान, या योजनेमध्ये ९७१ आजार असले, तरी काही आजारांचा या योजनते समावेश नाही, अशा (राजीव गांधीमध्ये न बसणाऱ्या शस्त्रक्रिया) आजारांवर उपचारांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून मदत केली जाणार आहे. यामध्ये हृदयशस्त्रक्रिया, ट्रामा (रस्त्यावरील भीषण अपघात), मेंदूमधील रक्तस्त्राव, कर्करोग (सर्व आजार) या आजारांचा समावेश आहे. त्यासाठी त्याला एक लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. मुंबई प्रथम; शेवट नंदूरबार राज्यात या योजनेमध्ये पहिला क्रमांक मुंबई जिल्हा, दुसरा अहमदनगर, तर तिसरा औरंगाबाद या जिल्ह्णांचा नंबर लागतो. त्या पाठोपाठ चौथा क्रमांक कोल्हापूर जिल्ह्णाचा लागला असून, पुणे जिल्ह्णाचा पाचवा, तर नाशिक सहाव्या क्रमांकावर आहे.नंदूरबार जिल्ह्णाचा क्रमांक शेवट लागतो. या एका वर्षात मुंबईमध्ये २१ हजार ६०५ जणांनी लाभ घेतला. यासाठी ६९ कोटी १७ लाख ४७ हजार ६१० रुपये खर्च झाले आहेत.तर नंदुरबार जिल्ह्णात वर्षात केवळ ९० जणांनी लाभ घेतला. यासाठी सहा लाख ५१ हजार रुपये खर्च करण्यात आले.कोल्हापूर जिल्हा दृष्टिक्षेपात...वर्ष लाभ खर्चरुग्णालय परतावा२१ नोव्हेंबर २०१३ ते१२ हजार २५०३५ कोटीसर्व२० नोव्हेंबर २०१४ २१ नोव्हेंबर २०१४ ते १८ हजार ७८ ५१ कोटी सुमारे ४० कोटी रुपये २०नोव्हेंबर २०१५४५ लाख(आजअखेर)अशी असते प्रक्रिया...मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामधून ज्यांना लाभ घ्यावयाचा असेल त्यांना राजीव गांधी योजनेतील समाविष्ठ असलेल्या संबंधित रुग्णालयांच्या डॉक्टरांचा दाखला द्यावा लागणार आहे. या दाखल्यामध्ये रुग्णाच्या खर्चाचा तपशील, त्याच्या बसत नसलेल्या आजाराचे नाव डॉक्टरला द्यावे लागणार आहे. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी हा दाखला घेऊन ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष ’या नावाने अर्ज तयार करावा व हा अर्ज जिल्हा समन्वयक यांच्याकडे शेरा मारून आणावा. या दाखल्यावर शेरा मारल्यानंतर नातेवाइकांनी हा अर्ज टपालाने पाठवावा, अथवा स्वहस्ते कक्षाकडे द्यावा. या कक्षातूनच संबंधित रुग्णाला ही मदत मिळणार आहे.