शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

कोल्हापूर : दिनकरला मिळाला हक्काचा निवारा, चंद्रकांतदादांच्या पुढाकाराला अनेक दातृत्वाचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 3:24 PM

जीवरक्षक म्हटले की करवीर तालुक्यातील कांडगावचा सुपुत्र दिनकर कांबळेचे नाव चटकन समोर येते. गेली अनेक वर्षे तो हक्काच्या घरापासून वंचित होता, यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला, त्यास समाजातील अनेक दातृत्वाचे हात लागले आणि दिनकरचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले.

ठळक मुद्देजीवबा नाना पार्क येथे हक्काच्या घराचे स्वप्न समाजातील अनेक दातृत्वाचे हात नवीन घरात संपर्क कार्यालयनोकरीही कायमची व्हावी

कोल्हापूर : जीवरक्षक म्हटले की करवीर तालुक्यातील कांडगावचा सुपुत्र दिनकर कांबळेचे नाव चटकन समोर येते. यामागे दिनकरचे कर्तृत्व आणि त्याग आहे. पण गेली अनेक वर्षे तो हक्काच्या घरापासून वंचित होता, यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला, त्यास समाजातील अनेक दातृत्वाचे हात लागले आणि दिनकरचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले.समाजात अनेकजण सामाजिक कामे करतात, पण त्यांच्यापेक्षा निश्चितच वेगळे असे काम दिनकर कांबळे करीत आहेत. मदत करायची राहू दे, पण त्या घटनेकडे बघायचेही धाडस होत नाही. अशी कामे करण्यासाठी पदोपदी स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्यांची संख्या फारच कमी. त्यामध्ये दिनकरचे नाव अव्वल घ्यावे लागेल.

गेली २२ वर्षे अविरतपणे हे काम सुरू आहे. त्यातून आपल्या पदरात काय पडणार, माझ्या कुटुंबाचे काय होणार, हे केल्यानंतर समाज मला काय देणार, हे विचार दिनकरच्या मनाला कधी शिवलेच नाहीत. त्यामुळेच आज एका विशिष्ट उंचीवर त्याचे नाव आहे.

सामाजिक काम करत असताना त्याचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते, कांडगावमध्ये राहते घर आहे. पण कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात एखादी दुर्घटना घडली, तर तेथून येताना वेळ जातो. यासाठी शहरात घराची गरज होती. अनेकांनी घरासह नोकरीची आश्वासने दिली, पण ती कधी हवेत विरली, हे दिनकरलाही कळले नाही.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिनकरला हक्काचा निवारा करून द्यायचा, हा निर्णय घेतला आणि जीवबा नाना पार्क परिसरात ‘वन बीएचके’ घराचे बुकिंगही केले. मंत्री पाटील यांच्या या निर्णयाला समाजातील अनेक दातृत्वाचे हात पुढे येत असल्याने लवकरच दिनकरला हक्काचा निवारा मिळणार आहे.

नोकरीही कायमची व्हावीदिनकर कांबळे सध्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहे. मंत्री पाटील यांनी त्याच्या कायमच्या निवाऱ्यांची सोय केली, त्याप्रमाणे नोकरीही कायम करावी, अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे.

नवीन घरात संपर्क कार्यालयकेवळ राहण्यासाठी नवीन घराचा वापर दिनकर करणार नाही. तिथे संपर्क कार्यालय सुरू केले जाणार असून, तिथे नागरिकांना थेट संपर्क साधता येणार आहे.

 

शहरात राहात नसल्याने दुर्घटना घडल्यानंतर तत्काळ पोहोचता येत नाही. ही गरज ओळखून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घर देऊन खूप मोठे काम केले. हे घर नसून नागरिकांसाठी संपर्क कार्यालय राहणार आहे.- दिनकर कांबळे, जीवरक्षक 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHomeघर