शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

सलग चौथ्या दिवशीही कोल्हापूर बंद. व्यापाऱ्यांचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 19:36 IST

CoronaVirus Kolhapur-कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या नियमावलीबाबत स्पष्टीकरण न झाल्यामुळे गुरुवारी सलग चौथ्या दिवशी कोल्हापूर शहरातील अत्यावश्यक सेवेतील व्यवहार वगळता बाकीचे सर्व व्यवहार बंद राहिले. त्यामुळे शहरातील रहदारीवरदेखील परिणाम झाला. दरम्यान, समस्त व्यापारी वर्गाचे राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे.

ठळक मुद्देसलग चौथ्या दिवशीही कोल्हापूर बंदव्यापाऱ्यांचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे

 कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या नियमावलीबाबत स्पष्टीकरण न झाल्यामुळे गुरुवारी सलग चौथ्या दिवशी कोल्हापूर शहरातील अत्यावश्यक सेवेतील व्यवहार वगळता बाकीचे सर्व व्यवहार बंद राहिले. त्यामुळे शहरातील रहदारीवरदेखील परिणाम झाला. दरम्यान, समस्त व्यापारी वर्गाचे राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून, सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असतानाच राज्य सरकारने दैनंदिन व्यवहारावर कडक निर्बंध लादले. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने तसेच व्यवहार वगळता बाकीची सर्व दुकाने व व्यापारी अस्थापना बंद करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. कडक निर्बंध म्हणजे दुकाने बंद ठेवावी लागतील, असे वाटले नाही; पण जेव्हा सोमवारी प्रत्यक्ष दुकाने उघडण्याची वेळ आली तेव्हा पोलीस व महापालिका प्रशासनाने ती बंद करण्यास भाग पाडले.

व्यापाऱ्यांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी प्रशासनास दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची विनंती करत आहेत; परंतु जिल्हा, पोलीस व महापालिका प्रशासनाने त्यांना तशी परवानगी दिली नाही. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून रोज सकाळी व्यापारी, दुकानदार आपापल्या व्यवसायाच्या ठिकाणी येतात. दुकाने उघडतात आणि प्रशासनाच्या दबावामुळे पुन्हा बंद करून घरी जातात. गुरुवारीदेखील हाच अनुभव आला.

गुरुवारी शहरात अनेक ठिकाणी दुकानदार दुकानाच्या दारात थांबून होते. काहींनी अर्धवट शटर उघडे ठेवून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. पोलीस, महापालिकेची गाडी आली की लगेच दुकान बंद करायचे आणि गाडी पुढे गेली की परत व्यवसाय सुरू करायचा, असा दिवसभर खेळ सुरू राहिला. महाद्वार, ताराबाई रोड, पापाची तिकटी, चप्पल लाइन, राजारामपुरी, शाहूपुरी, स्टेशनरोड, उमा टॉकीज रोड, टेंबे रोड, मिरजकर तिकटी या परिसरातील दुकाने बंद राहिली. लक्ष्मीपुरीतील गर्दीवर मात्र कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. एकाच ठिकाणी धान्याची दुकाने, मसाल्याची दुकाने, भाजी मंडई, फळ बाजार असल्यामुळे ही गर्दी होत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर