शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

पाऊस गेला...जीव टांगणीला; शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 13:14 IST

पावसाने उसंत घेतल्याने खरीप पिके धोक्यात

कोल्हापूर : गेल्या आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. माळरानावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली असून भुईमूग, नागली, भात पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. रोज उठले की पांढरे शुभ्र आकाश दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. पिकांना मारक तर किडींना पोषक वातावरण असल्याने किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.यंदा वरुणराजाच्या मनात काय आहे, हेच कळेना झाले. जून महिना कोरडा गेला, त्यानंतर जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने पेरण्या होऊ शकल्या. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उघडझाप राहिल्याने पिकांची वाढ सुरू झाली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.विशेषत: माळरानावरील भुईमूग, भात, नागली ही पिके धोक्यात आली आहेत. नदी व विहिरीवरील विद्युत पंपाची वीज सोडवलेली आहे. त्यामुळे जिथे पाण्याची सोय आहे; पण वीज नसल्याने विद्युत पंप सुरू करता येईनात. गेल्या वर्षी २२ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी १०४१ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा तो ७९९ मिलिमीटरवरच थांबला आहे.जिल्ह्यात ९६ टक्के पेरण्याजून महिना कोरडा गेल्याने जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या. जिल्ह्याचे १ लाख ९२ हजार ६३३ हेक्टर पेरक्षेत्र आहे. त्यापैकी यंदा १ लाख ८६ हजार १६७ हेक्टर (९६.७६ टक्के) पेरणी झालेली आहे.

ओढे-नाले आटलेयंदा जुलै महिन्यात ओढ्या-नाल्यांना पाणी आले; मात्र पावसाने दडी मारल्यानंतर त्यातील पाणीही आटले आहे. ओढ्या-नाल्यांतील पाणी माळरानावरील पिकांना आधार असतो. यातच पाणी नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात आकाशाकडे बघण्यापलीकडे काहीच नाही.

‘तांबेरा’, ‘करपा’ किडीचा प्रादुर्भावकिडीला पोषक असेच सध्या वातावरण आहे. त्यामुळे सोयाबीन, भात, भुईमूग पिकांवर ‘तांबेरा’, ‘करपा’ या किडीचा प्रादुर्भाव अधिक जाणवू लागला आहे. उसावरही लोकरी माव्याचे संकट आले आहे. आगामी काळात जोरदार पाऊस झाला नाहीतर हा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता धूसरच

एकूणच हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी आठवडाभर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता धूसर आहे. काही ठिकाणी तुरळक सरी कोसळतील, मात्र शेतीला अपेक्षित पाऊस पडणार नाही.ऑगस्टमध्ये अंगातून घामाच्या धाराऑगस्ट महिन्यात जिल्ह्याचा पारा ३२ डिग्रीपर्यंत पाेहोचला आहे. दुपारी तर अंग भाजून निघत आहे. ऑक्टोबरची हिट जाणवू लागली असून, त्यामुळे अंगाकतून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

गेल्यावर्षीच्या तुलनेत २२ ऑगस्टपर्यंतचे पर्जन्यमान मिलिमीटरमध्येतालुका          २२ ऑगस्ट २०२२    २२ ऑगस्ट २०२३हातकणंगले       ४२९                         ३२१शिरोळ              २६८                         २६०पन्हाळा             ११०२                        ८२९शाहूवाडी          १६५७                       ११४४राधानगरी         १५५१                        १०५२गगनबावडा      ३१४५                        २७२५करवीर             ७८४                         ५८३कागल              ७५४                         ५६१गडहिंग्लज        ६४३                         ४६२भुदरगड           १५७७                      १३७८आजरा             १३०१                        १०७२चंदगड             १५०५                       ११९६

जुलै महिन्यातील पंधरा-वीस दिवसांतील पाऊस वगळता सरासरीच्या कमी पाऊस आहे. एल निनोच्या प्रभावामुळे सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - राहुल पाटील (मुख्य प्रबंधक, हवामान साक्षरता अभियान)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसFarmerशेतकरी