शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

पाऊस गेला...जीव टांगणीला; शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 13:14 IST

पावसाने उसंत घेतल्याने खरीप पिके धोक्यात

कोल्हापूर : गेल्या आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. माळरानावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली असून भुईमूग, नागली, भात पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. रोज उठले की पांढरे शुभ्र आकाश दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. पिकांना मारक तर किडींना पोषक वातावरण असल्याने किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.यंदा वरुणराजाच्या मनात काय आहे, हेच कळेना झाले. जून महिना कोरडा गेला, त्यानंतर जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने पेरण्या होऊ शकल्या. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उघडझाप राहिल्याने पिकांची वाढ सुरू झाली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.विशेषत: माळरानावरील भुईमूग, भात, नागली ही पिके धोक्यात आली आहेत. नदी व विहिरीवरील विद्युत पंपाची वीज सोडवलेली आहे. त्यामुळे जिथे पाण्याची सोय आहे; पण वीज नसल्याने विद्युत पंप सुरू करता येईनात. गेल्या वर्षी २२ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी १०४१ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा तो ७९९ मिलिमीटरवरच थांबला आहे.जिल्ह्यात ९६ टक्के पेरण्याजून महिना कोरडा गेल्याने जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या. जिल्ह्याचे १ लाख ९२ हजार ६३३ हेक्टर पेरक्षेत्र आहे. त्यापैकी यंदा १ लाख ८६ हजार १६७ हेक्टर (९६.७६ टक्के) पेरणी झालेली आहे.

ओढे-नाले आटलेयंदा जुलै महिन्यात ओढ्या-नाल्यांना पाणी आले; मात्र पावसाने दडी मारल्यानंतर त्यातील पाणीही आटले आहे. ओढ्या-नाल्यांतील पाणी माळरानावरील पिकांना आधार असतो. यातच पाणी नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात आकाशाकडे बघण्यापलीकडे काहीच नाही.

‘तांबेरा’, ‘करपा’ किडीचा प्रादुर्भावकिडीला पोषक असेच सध्या वातावरण आहे. त्यामुळे सोयाबीन, भात, भुईमूग पिकांवर ‘तांबेरा’, ‘करपा’ या किडीचा प्रादुर्भाव अधिक जाणवू लागला आहे. उसावरही लोकरी माव्याचे संकट आले आहे. आगामी काळात जोरदार पाऊस झाला नाहीतर हा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता धूसरच

एकूणच हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी आठवडाभर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता धूसर आहे. काही ठिकाणी तुरळक सरी कोसळतील, मात्र शेतीला अपेक्षित पाऊस पडणार नाही.ऑगस्टमध्ये अंगातून घामाच्या धाराऑगस्ट महिन्यात जिल्ह्याचा पारा ३२ डिग्रीपर्यंत पाेहोचला आहे. दुपारी तर अंग भाजून निघत आहे. ऑक्टोबरची हिट जाणवू लागली असून, त्यामुळे अंगाकतून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

गेल्यावर्षीच्या तुलनेत २२ ऑगस्टपर्यंतचे पर्जन्यमान मिलिमीटरमध्येतालुका          २२ ऑगस्ट २०२२    २२ ऑगस्ट २०२३हातकणंगले       ४२९                         ३२१शिरोळ              २६८                         २६०पन्हाळा             ११०२                        ८२९शाहूवाडी          १६५७                       ११४४राधानगरी         १५५१                        १०५२गगनबावडा      ३१४५                        २७२५करवीर             ७८४                         ५८३कागल              ७५४                         ५६१गडहिंग्लज        ६४३                         ४६२भुदरगड           १५७७                      १३७८आजरा             १३०१                        १०७२चंदगड             १५०५                       ११९६

जुलै महिन्यातील पंधरा-वीस दिवसांतील पाऊस वगळता सरासरीच्या कमी पाऊस आहे. एल निनोच्या प्रभावामुळे सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - राहुल पाटील (मुख्य प्रबंधक, हवामान साक्षरता अभियान)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसFarmerशेतकरी