शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा तलावाचे पाणी १५ फुटांवर

By admin | Updated: May 8, 2015 00:19 IST

उपनगरातील पाणीप्रश्न गंभीर : नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले

अमर पाटील -कळंबा कळंबा व उपनगरांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असणाऱ्या कळंबा तलावातील पाण्याची पातळी ऐन उन्हाळ्यात अवघी पंधरा फुटांवर आली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तलावाचा वापर मोठ्या प्रमाणावर अंघोळ, जनावरे व कपडे धुण्यासाठी होतो.कळंबा तलावाचे एकूण क्षेत्र ६३.९३ हेक्टर व पाणी साठवण क्षमता ७.३५ दशलक्ष घनफूट आहे. गेल्या पाच वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने व तलावातील गाळ न काढल्याने पाणीसाठा कमी होतो. या तलावातून कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, जरगनगर व अन्य उपनगरांस पाणीपुरवठा केला जातो. कात्यायनी टेकड्यांतून वाहणारे पाणी हा तलावाचा मुख्य जलस्रोत आहे; पण बेसुमार वृक्षतोडीने तो कमी झाला आहे. तलावातील पाणीपातळी कमी झाल्याने रोज एक तास येणारे पाणी पंधरा मिनिटे सोडण्यात येत आहे. पाणी समस्येचे गंभीर स्वरूप नागरिकांनी लक्षात घेऊन घरोघरी मोठ्या पाण्याच्या टाक्या बसविल्या आहेत; पण तलावातून येणारे पाणी पिण्यास योग्य नाही. त्याचा उग्र वास येत असून, ते हिरवट असल्याची तक्रार सर्वच नागरिक करीत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना बोअरवेल, विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे.दोन वर्षांपूर्वी पालिका व पाटबंधारे विभागाने गाळ उपसा केल्यामुळे पाणीसाठा वाढला होता. त्यामुळे टंचाई नव्हती; पण यंदा पुन्हा 'येरे माझ्या मागल्या' अशी अवस्था झाल्यामुळे कळंबावासीयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.४तलाव पूर्ण आटला असून, ज्याला ‘डेड वॉटर’ (मृत पाणी) म्हणता येईल, असेच पाणी आता शिल्लक राहिले आहे.४राजर्षी शाहू महाराज हे दूरदृष्टीचे राजे होते. तलाव जरी पूर्ण क्षमतेने आटला तरी जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी तलावात मजबूत विहिरी खोदल्या होत्या. सध्या त्या उघड्या पडल्या आहेत. प्रदूषणाने त्यातील पाणीही वापरण्यासाठी योग्य राहिलेले नाही.४तलावाचे सुशोभीकरण करण्याची पालिकेची भीमगर्जना आता हवेत विरली असून, सुशोभीकरणाचा निधी सात कोटी ७५ लाख वर्षापूर्वी पालिका खात्यावर जमा; पण कार्यवाही मात्र शून्य.४तलाव जरी जीवन प्राधिकरणाने पालिकेकडे हस्तांतरित केला असला, तरी तलावाच्या पाण्याचा वापर कळंबा ग्रामपंचायतच जास्त करते. त्यामुळे तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्याची जबाबदारी पालिकेइतकी ग्रामपंचायतीची आहे; पण नोटीसबोर्ड लावण्यापलीकडे ठोस कार्यवाही ग्रामपंचायतीने केलेली नाही.