शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

चला जपूया जंगल, पाणवठे, पक्षी, प्राणी...

By admin | Updated: May 8, 2015 00:15 IST

मोनेरा फौंडेशनची मोहीम : जंगलातील पाणवठे केले पुनर्जिवित; मानव-प्राणी संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न

आंबा : ठिकाण वाघझऱ्या परिसरातील भिवतळीचे जंगल. पंधरा तरुणांचा ग्रुप हातात फावडे, कुदळ घेऊन जंगल कपारीतील पाण्याचा जिंवत झरा मोकळा करीत होते. दगड-गोटे, पाला अन् मातीने मुजलेले पाणवठे मोकळे करून पाणी वाहते करीत होते. या तरुणांनी दोन दिवसांत सहा पाणवठे पुनर्जीवित केले. निमित्य होते मोनेरा फौंडेशनच्या ‘चला जपुया जंगली पाणवठे’, या उपक्रमाचे. मोनेराच्या निसर्गप्रेमींनी परीक्षेचा शीण थेट जंगलातील पाणवठे पुनर्जीवित करण्यासाठी घालवला. जंगली प्राणी पाण्यासाठी मानवी वस्ती, शेतीत न येता जंगलातील पाणवठ्यांवरच स्थिर राहावेत, तसेच माणूस व प्राण्यांतील संघर्षाची तीव्रता कमी व्हावी म्हणून हा या निसर्गप्रेमींचा विधायक उपक्रम गेली दोन वर्षे चालू आहे. पर्यावरण अभ्यासक प्रमोद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य बेर्डे, प्रा. सुनील पाटील, वैभव पाटील, रेश्मा पाटील, रोहित पाटील, स्वप्निल सणगर, धनंजय अवसरे, स्वरूप अवसरे, हेंमत देशमुख, ओंकार चव्हाण, डॉ. योगेश फोंडे, संदीप वडर, विनोद ढोके, प्रथमेश शेळके, आदी मोनेरा फौंडेशनच्या सदस्यांनी चाळणवाडी येथील बाध्याचे पाणी व जखिणीचे पाणी, वाघझऱ्याजवळील पाथरझरा, माकडीणीचे तळे, आंबाघाटातील गायकुंड, आदी पाणवठे, तर रानडुकरांना उन्हात लोळण घेण्यासाठी मढबाथ तयार केले आहेत. येथे जंगली प्राणी, पक्षी चिखलात लोळून व मनसोक्त पाणी पिऊन उन्हाच्या झळा कमी करतात. याबाबत प्रमोद माळी म्हणाले, विविध टप्प्यांतील पाणवठ्यावर विविध प्रकारच्या पक्षी व प्राण्यांची तहान भागते. यांचा सर्व्हे करून त्यांची पुनरनिर्मिती हाती घेतली. यामुळे आता सर्व झरे नियमित पाझरू लागले असून, पाण्याची साठवण झाली आहे. धोपेश्वर परिसरातील बॉक्साईट उत्खननामुळे आंबा-विशाळगड जंगलाकडे सरकलेल्या पशु-पक्षांची तहाण या पाणवठ्यांवर भागत आहे. जंगल व्यवस्थापनासाठी स्थानिक वनसमित्या व पर्यावरणप्रेमी संघटनांची मदत मोलाची ठरत आहे. गरज प्राण्यांच्या गरजा जाणण्याचीमोनेरा फौंडेशन, सह्याद्री लोकविकास संस्था व वसुंधरा नेचर क्लब यांनी पाणवठे संवर्धनाचा प्रस्ताव कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांना मार्च महिन्यात सादर केला. प्राण्यांना जंगलातच पाणी व अन्न मिळाले, तर ते शेती व मानवी वस्तीकडे वळणार नाहीत. परिणामी माणूस व जंगली प्राणी असा संघर्ष नाहीसा होईल. त्यासाठी या प्रस्तावाबाबत वनविभागाने लक्ष वेधण्याची गरज आहे. जंगलतोड, वणवे व बॉक्साईटच्या उत्खननामुळे चारा व पाणी कमी झाल्याने गवे, डुक्कर कळपाने शेतीकडे मोर्चा वळवित आहेत.त्यामुळे जंगलालगतची शेती थांबली आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाईमुळे प्राण्याचे हाल होत आहेत. प्राणीगणनेपुढे जाऊन त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणारे ठोस उपक्रम वनविभागाने हाती घेण्याची गरज आहे